शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

उशिरा लग्न लावल्यास पाच हजाराचा दंड !

By admin | Updated: January 12, 2016 01:37 IST

भावसार समाजाचे ‘समय के साथ चलो’ अभियान.

अनिल गवई /खामगाव (जि.बुलडाणा): गेल्या काही दिवसांपासून उशिरा लग्न लावण्याची प्रथाच पडली आहे. यामुळे वेळेवर लग्नासाठी पोहोचणार्‍या वर्‍हाड्यांसह नातेवाईक आणि मित्रमंडळीला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी भावसार समाज मंडळाने पुढाकार घेतला असून, यापुढे समाजामध्ये उशिरा लग्न लावणार्‍या वधू आणि वराकडील मंडळींना ५ हजारांचा दंड ठोठावण्याचा एकमुखी ठराव बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने रविवारी येथे घेतला. उशिरा लग्न लावण्याची प्रथा रूढ झाल्यामुळे अनेकदा बँड पथक, मंगल कार्यालय आणि तत्सम गोष्टींसाठी विहीत मुदतीत केलेल्या करारावरून तसेच वधू, वराकडील मंडळींमध्ये वादही उद्भवतात. या पृष्ठभूमिवर वेळेवर लग्न लावण्यासाठी एक आदर्श संहिताच महाराष्ट्र भावसार समाजाशी संलग्नीत असलेल्या बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने तयार केली आहे. तसे विविध ठरावदेखील एकमुखाने संमत करीत या ठरावाची अंमलबजावणी १0 जानेवारीपासून सुरु केली आहे. उशिरा लग्न लावणार्‍या वधू आणि वराकडील मंडळींना प्रत्येकी अडीच हजार रुपये म्हणजेच दोन्ही पक्षांकडून पाच हजारांचा दंड भावसार समाज मंडळ वसूल करणार आहे. भावसार समाज मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन खामगावजवळ असलेल्या जनुना देवी येथे रविवारी पार पडले. या सभेला भावसार समाजाचे महाराष्ट्र तथा विदर्भातील नेते मंडळी मोठय़ासंख्येने उपस्थित होती. पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार ! वेळेवर लग्न लावण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठीही भावसार समाजाने पुढाकार घेतला आहे. समाजातील आदर्श आचार संहिता तयार करताना पर्यावरण रक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विवाह सोहळा, व्रतवैकल्य, वाढदिवस, दशक्रिया विधी, तेरवी यासारख्या सामाजिक उपक्रमामध्ये प्लास्टीक पत्रवाळ्या, द्रोण सुध्दा न वापरण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. त्यामुळे प्लास्टीक द्रोण आणि पत्रावळी वापरल्यास २१00 रुपये दंड सुध्दा संबंधितांना भरावा लागणार आहे.