शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दोन दिवसांत एसटीचे भारमानही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2016 04:13 IST

५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतला. या निर्णयामुळे देशभरात गोंधळ उडाला असून

मुंबई : ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतला. या निर्णयामुळे देशभरात गोंधळ उडाला असून, अनेकांकडे सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळालाही बसला. दोन दिवसांत प्रवाशांनी प्रवास टाळल्यामुळे महामंडळाचे भारमान ५ टक्क्यांहून अधिक कमी झाले. याच कारणामुळे पुढील दोन-तीन दिवसांत आणखी भारमान घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर चांगलाच परिणाम होऊ लागला. नोटा बंद करण्याचा निर्णय अचानक घेतल्याने अनेकांनी त्या बदली करण्यासाठी बँकांकडे धाव घेतली. मात्र लांबच लांब रांगा, तासन्तास लागणारा वेळ आणि मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने काही वेळातच संपणारी रक्कम यामुळे मोठा गोंधळ उडत आहे. अनेकांकडे ५00 आणि १000च्या नोटा जरी असल्या तरी सुटे पैसे नसल्याने दैनंदिन खर्च करायचा कसा, असा सवाल उपस्थित झाला. त्यामुळे एखाद्या ठिकाणी गेल्यास छोट्या-मोठ्या खर्चाची समस्याही जाणवत आहे. या सर्व कारणांचा परिणाम राज्याची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी सेवेवरही झाला. महामंडळाने प्रवाशांकडून तिकिटांसाठी ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा ११ नोव्हेंबरपर्यंत घेण्याच्या निर्णय घेतला. या नोटा जरी घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असला तरी प्रत्यक्षात सुट्या पैशांच्या चणचणीमुळे प्रवाशांनी लांब पल्ल्याबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रवास करणेही टाळले असल्याचे समोर आले. त्याचा परिणाम एसटीच्या भारमानावर झाला. एसटीचे दिवाळीदरम्यान ६५ टक्के असलेले भारमान १0 आणि ११ नोव्हेंबर या दोन दिवसांत ५ टक्क्याहून अधिक घसरले. महामंडळाचे भारमान हे प्रत्येक वर्षी दिवाळी संपल्यानंतरही पुढील काही दिवस असेच असते. त्यानुसार १४ नोव्हेंबरपर्यंत एसटीचे भारमान ६५ टक्क्यांपर्यंत राहिले असते. मात्र त्याआधीच भारमान घसरले. १४ नोव्हेंबरपर्यंत भारमान आणखी घसरण्याची भीती महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे.दोन दिवसांत भारमान घसरल्याने जवळपास ४ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न बुडाले. कार्तिकी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाने ७ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने मुंबईसह अन्य ठिकाणांहून १५0 बसेस पंढरपूरसाठी सोडल्या. मात्र या बसेसचे आरक्षण आधीच झाल्याने अशा प्रवाशांना त्याचा फटका बसला नाही. परंतु १0 नोव्हेंबर रोजी पंढरपूरला अन्य ठिकाणाहून जाण्यासाठी एसटी आगारात किंवा स्थानकात येऊन एसटी पकडणाऱ्यांची गर्दी मात्र कमी झाली. टोलमाफी एसटीला तारणारयाच कारणांमुळे ९ नोव्हेंबरपासून सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. ही टोलमाफी १४ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्याचा फायदा एसटीला मिळत असून, दिवसाला ३५ लाख रुपयांची बचत होत आहे. भारमान जरी घटले असले तरी टोलमाफी एसटीला तारू शकते, अशी आशा व्यक्त केली जाते. महामंडळ वर्षाला १३0 कोटी रुपये टोल भरत आहे.