शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत एसटीचे भारमानही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2016 04:13 IST

५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतला. या निर्णयामुळे देशभरात गोंधळ उडाला असून

मुंबई : ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतला. या निर्णयामुळे देशभरात गोंधळ उडाला असून, अनेकांकडे सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळालाही बसला. दोन दिवसांत प्रवाशांनी प्रवास टाळल्यामुळे महामंडळाचे भारमान ५ टक्क्यांहून अधिक कमी झाले. याच कारणामुळे पुढील दोन-तीन दिवसांत आणखी भारमान घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर चांगलाच परिणाम होऊ लागला. नोटा बंद करण्याचा निर्णय अचानक घेतल्याने अनेकांनी त्या बदली करण्यासाठी बँकांकडे धाव घेतली. मात्र लांबच लांब रांगा, तासन्तास लागणारा वेळ आणि मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने काही वेळातच संपणारी रक्कम यामुळे मोठा गोंधळ उडत आहे. अनेकांकडे ५00 आणि १000च्या नोटा जरी असल्या तरी सुटे पैसे नसल्याने दैनंदिन खर्च करायचा कसा, असा सवाल उपस्थित झाला. त्यामुळे एखाद्या ठिकाणी गेल्यास छोट्या-मोठ्या खर्चाची समस्याही जाणवत आहे. या सर्व कारणांचा परिणाम राज्याची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी सेवेवरही झाला. महामंडळाने प्रवाशांकडून तिकिटांसाठी ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा ११ नोव्हेंबरपर्यंत घेण्याच्या निर्णय घेतला. या नोटा जरी घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असला तरी प्रत्यक्षात सुट्या पैशांच्या चणचणीमुळे प्रवाशांनी लांब पल्ल्याबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रवास करणेही टाळले असल्याचे समोर आले. त्याचा परिणाम एसटीच्या भारमानावर झाला. एसटीचे दिवाळीदरम्यान ६५ टक्के असलेले भारमान १0 आणि ११ नोव्हेंबर या दोन दिवसांत ५ टक्क्याहून अधिक घसरले. महामंडळाचे भारमान हे प्रत्येक वर्षी दिवाळी संपल्यानंतरही पुढील काही दिवस असेच असते. त्यानुसार १४ नोव्हेंबरपर्यंत एसटीचे भारमान ६५ टक्क्यांपर्यंत राहिले असते. मात्र त्याआधीच भारमान घसरले. १४ नोव्हेंबरपर्यंत भारमान आणखी घसरण्याची भीती महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे.दोन दिवसांत भारमान घसरल्याने जवळपास ४ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न बुडाले. कार्तिकी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाने ७ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने मुंबईसह अन्य ठिकाणांहून १५0 बसेस पंढरपूरसाठी सोडल्या. मात्र या बसेसचे आरक्षण आधीच झाल्याने अशा प्रवाशांना त्याचा फटका बसला नाही. परंतु १0 नोव्हेंबर रोजी पंढरपूरला अन्य ठिकाणाहून जाण्यासाठी एसटी आगारात किंवा स्थानकात येऊन एसटी पकडणाऱ्यांची गर्दी मात्र कमी झाली. टोलमाफी एसटीला तारणारयाच कारणांमुळे ९ नोव्हेंबरपासून सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. ही टोलमाफी १४ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्याचा फायदा एसटीला मिळत असून, दिवसाला ३५ लाख रुपयांची बचत होत आहे. भारमान जरी घटले असले तरी टोलमाफी एसटीला तारू शकते, अशी आशा व्यक्त केली जाते. महामंडळ वर्षाला १३0 कोटी रुपये टोल भरत आहे.