शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यात रबीची पेरणी अंतिम टप्प्यात !

By admin | Updated: December 3, 2015 01:36 IST

अल्प पावसाची झळ खरिपाप्रमाणे रबी हंगामाला बसली असून, आतापर्यंत राज्यात ५५ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. राज्यातील आठ विभागांत शेतकऱ्यांनी विविध रबी पिकांची

अकोला : अल्प पावसाची झळ खरिपाप्रमाणे रबी हंगामाला बसली असून, आतापर्यंत राज्यात ५५ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. राज्यातील आठ विभागांत शेतकऱ्यांनी विविध रबी पिकांची पेरणी केली आहे. ही पेरणी आता अंतिम टप्प्यात आहे, पण संरक्षित ओलितासाठी असलेले अल्प पाणी आणि जमिनीत ओलावा नसल्याने उत्पादनाची शाश्वती शेतकऱ्यांना कमीच वाटत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त होती; परंतु परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बी हंगामातील उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तथापि, कोरडे शेत ठेवून करायचे काय, म्हणून शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेवून रब्बीची पेरणी केली आहेत. राज्यातील रब्बीचे क्षेत्र ६२ लाख ४३ हजार हेक्टर आहे. यात कोकण विभागातील ०.३४ लाख हेक्टरपैकी गत आठवड्यापर्यंत ०.००६ लाख हेक्टर म्हणजेच सरासरी क्षेत्राशी तुलना केल्यास केवळ दोन टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती.या विभागात भात कापणी झालेल्या क्षेत्रावर रब्बीची तयारी सुरू असून,आतापर्यंत दोन टक्क्यांच्या वर पेरणीचा आकडा अगदी थोडा वाढला आहे. नाशिक विभागात रब्बीचे सरासरी ४.१५ लाख हेक्टर क्षेत्र असून, गत आठवड्यापर्यंत १.१६ लाख हेक्टर २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.या आठवड्यात कालव्याचे पाणी सोडणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने पेरणीत थोडी वाढ झाली आहे. पुणे विभागातील रब्बीचे २२.०१ लाख सरासरी क्षेत्र आहे. मागील आठवड्यात १२.५३ लाख हेक्टर म्हणजे ५७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये या आठवड्यात भर पडली आहे. कोल्हापूर विभागात ५.०९ लाख हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. त्यापैकी ३.१९ लाख हेक्टर ६३ टक्के पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागातील ८.६३ लाख हेक्टरपैकी ५.५६ लाख म्हणजेच ६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. यात या आठवड्यात थोडीशी वाढ झाली आहे. लातूर विभागातील १२.१४ लाखपैकी ७.४० लाख हेक्टर (६१ टक्के) पेरणी झाली आहे.अमरावती विभागातील ५.९३ लाख हेक्टरपैकी ३ लाख ६७ हजार ५०० हेक्टर (६२ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नागपूर विभागातील ४.१३ लाख हेक्टरपैकी ०.५० लाख हेक्टरवर (१२ टक्के) पेरणी झाली होती. यात अल्पशी वाढ झाली आहे.