शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

राज्यात रबीची पेरणी अंतिम टप्प्यात !

By admin | Updated: December 3, 2015 01:36 IST

अल्प पावसाची झळ खरिपाप्रमाणे रबी हंगामाला बसली असून, आतापर्यंत राज्यात ५५ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. राज्यातील आठ विभागांत शेतकऱ्यांनी विविध रबी पिकांची

अकोला : अल्प पावसाची झळ खरिपाप्रमाणे रबी हंगामाला बसली असून, आतापर्यंत राज्यात ५५ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. राज्यातील आठ विभागांत शेतकऱ्यांनी विविध रबी पिकांची पेरणी केली आहे. ही पेरणी आता अंतिम टप्प्यात आहे, पण संरक्षित ओलितासाठी असलेले अल्प पाणी आणि जमिनीत ओलावा नसल्याने उत्पादनाची शाश्वती शेतकऱ्यांना कमीच वाटत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त होती; परंतु परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बी हंगामातील उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तथापि, कोरडे शेत ठेवून करायचे काय, म्हणून शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेवून रब्बीची पेरणी केली आहेत. राज्यातील रब्बीचे क्षेत्र ६२ लाख ४३ हजार हेक्टर आहे. यात कोकण विभागातील ०.३४ लाख हेक्टरपैकी गत आठवड्यापर्यंत ०.००६ लाख हेक्टर म्हणजेच सरासरी क्षेत्राशी तुलना केल्यास केवळ दोन टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती.या विभागात भात कापणी झालेल्या क्षेत्रावर रब्बीची तयारी सुरू असून,आतापर्यंत दोन टक्क्यांच्या वर पेरणीचा आकडा अगदी थोडा वाढला आहे. नाशिक विभागात रब्बीचे सरासरी ४.१५ लाख हेक्टर क्षेत्र असून, गत आठवड्यापर्यंत १.१६ लाख हेक्टर २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.या आठवड्यात कालव्याचे पाणी सोडणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने पेरणीत थोडी वाढ झाली आहे. पुणे विभागातील रब्बीचे २२.०१ लाख सरासरी क्षेत्र आहे. मागील आठवड्यात १२.५३ लाख हेक्टर म्हणजे ५७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये या आठवड्यात भर पडली आहे. कोल्हापूर विभागात ५.०९ लाख हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. त्यापैकी ३.१९ लाख हेक्टर ६३ टक्के पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागातील ८.६३ लाख हेक्टरपैकी ५.५६ लाख म्हणजेच ६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. यात या आठवड्यात थोडीशी वाढ झाली आहे. लातूर विभागातील १२.१४ लाखपैकी ७.४० लाख हेक्टर (६१ टक्के) पेरणी झाली आहे.अमरावती विभागातील ५.९३ लाख हेक्टरपैकी ३ लाख ६७ हजार ५०० हेक्टर (६२ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नागपूर विभागातील ४.१३ लाख हेक्टरपैकी ०.५० लाख हेक्टरवर (१२ टक्के) पेरणी झाली होती. यात अल्पशी वाढ झाली आहे.