शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

नाग व पिवळी नदी प्रकल्प अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:24 IST

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नद्या संवर्धन योजनेंतर्गत(एनआरसीपी) उपराजधानीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या नागनदी सोबतच पिवळी नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देदिल्लीत लवकरच बैठक : १२५२.३२ कोटींचा प्रकल्प

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नद्या संवर्धन योजनेंतर्गत(एनआरसीपी) उपराजधानीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या नागनदी सोबतच पिवळी नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. १२५२.३२ कोटींच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारने यापूर्वीच तत्त्वत: मान्यता दिली आहे. प्रकल्पासंदर्भात या आठवड्यात दिल्ली येथे बैठक बोलावण्यात आली आहे. यात या प्रकल्पाला हिरवी झेंडी मिळण्याची आशा आहे.प्रकल्पात केंद्र सरकारचा ६० टक्के, राज्य सरकारचा २५ तर महापालिकेचा १५ टक्के वाटा राहणार आहे. विशेष म्हणजे नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प अहवाल २०११ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरडीसी) यांच्याकडे पाठविला होता. तीन वर्षानंतर आॅगस्ट २०१४ मध्ये आयआयटी रुरकीच्या तज्ज्ञांनी नागनदीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रकल्प आराखड्यात काही बदल करून सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. यात नागनदी व बोर नाल्याचा समावेश होता. परंतु पिवळी नदी ही नागनदीची उपनदी असल्याने या नदीचाही या प्रकल्पात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे उत्तर व मध्य नागपुरातील दूषित पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. दोन्ही नद्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. दिल्लीत बैठक होत असल्याला प्रकल्प अभियंता मो. इसराईल यांनी दुजोरा दिला आहे. नद्यांचा प्रवाह शुद्ध करण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर सिवरेज लाईन टाकून त्यावर ठिकठिकाणी छोटे-छोटे मलनिस्सारण प्रकल्प उभारणे, नदीला संरक्षक भिंत, आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ते, हिरवळ व वृक्षारोपण आदी विकास कामांचा यात समावेश आहे.नद्यात येणारे सांडपाणी रोखणारनाग व पिवळी नदीत प्रक्रिया न करताच सोडण्यात येणारे सांडपाणी व कारखान्यातील दूषित पाणी रोखण्यात येणार आहे. यासाठी टाकण्यात येणाºया सिवरेज लाईन सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडण्यात येणार आहे. प्रकल्पात याचा समावेश करण्यात आला आहे.प्रक्रिया केंद्रावर ११०० कोटींचा खर्चनाग व पिवळी नदीचे पाणी प्रदूषणमुक्त मध्य व उत्तर नागपुरातील सिवरेज नद्यात सोडले जाऊ नये यासाठी उपयायोजना करण्यात येणार आहे. यात मलनिस्सारण केंद्रांची उभारणी व प्रक्रिया केंद्राला सिवरेज लाईन जोडण्यात येणार आहे. यावर ११०० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.