शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

ठाण्यातील पाणीपुरवठ्याचा तपासणी अहवाल अंतिम टप्प्यात - बबनराव लोणीकर

By admin | Updated: April 2, 2016 01:33 IST

ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्य:स्थितीबाबतची तपासणी विभागीय आयुक्तांमार्फत केली जात असून, त्याबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे पाणीपुरवठा आणि

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्य:स्थितीबाबतची तपासणी विभागीय आयुक्तांमार्फत केली जात असून, त्याबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबद्दल मनीषा चौधरी, किसन कथोरे, प्रशांत बंब, डॉ. पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, सुभाष पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजीत पाटील, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.लोणीकर म्हणाले की, मुरबाड तालुक्यामध्ये २००५पासून १८७ पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर असून, १० वर्षांमध्ये त्यापैकी ४९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १३८ योजनांपैकी ३४ योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असून, त्यातून पुरवठा सुरू करण्यात आला आहे. २१ योजनांची कामे सुरू असून, २३ योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार निदर्शनास आल्याने संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष व सचिवांवर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र माअंतर्गत मंजूर योजना वेगवेगळ्या कारणांमुळे अपूर्ण असून, याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत ठाणे जिल्ह्यातील १० वर्षांतील योजनांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात हा अहवाल राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांची माहितीही घेण्यात येत असून, अनेक योजनांचा मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात आला आहे, असेही लोणीकर यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)