शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम विदाई

By admin | Updated: July 2, 2017 01:30 IST

विवेक माझा मित्र. चितेवर त्याचा देह चढविताना खूपच वजनदार झाला. चितेवर चढलेल्या वा चढविलेल्या त्याच्या देहाला डोळाभर न्याहळत असताना, कोणीतरी

- डॉ. नीरज देव  विवेक माझा मित्र. चितेवर त्याचा देह चढविताना खूपच वजनदार झाला. चितेवर चढलेल्या वा चढविलेल्या त्याच्या देहाला डोळाभर न्याहळत असताना, कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर मोठे लाकडाचे खोड ठेवले व त्याचा चेहरा दिसेनासा झाला. त्या लाकडांमध्ये आता काष्ठवत् झालेला त्याचा देह; देहरूपी काष्ठ काष्ठातच दाबले गेले, चिता पेटविली गेली. तो दाह बसताच, मी झटकन मागे सरकलो. विचारांचे आवर्तन सुरू झाले. आज मी चटकन बाजूला सरकलो, तरी पुढे केव्हातरी मीही अशीच आगीची शाल लपेटून झोपणार.. तेवढ्यात शब्द कानावर आदळले अंतिम विदाई. अखेरचा निरोप! अंतिम विदाई? अरे, येथे तर फक्त मृतदेह आहे. काष्ठवत लाकडासारखा त्याला लाकडात रचणे ही का असते अंतिम विदाई? देह मोठा की आत्मा-देहातील चैतन्य? जर उत्तर चैतन्य असेल, तर ते जेव्हा जाते, त्याच वेळी खरी अंतिम विदाई झालेली असते. त्या वेळी कोण जवळ असेल-नसेल सांगता येत नाही. हे तर केवळ उपचार झाले देहाला मिटवायचे. मृत्यूचा न्याय सारखा असतो. आपले उपचार असतात वेगळे. मग अंतिम विदाई याला कसे म्हणायचे? कदाचित, असे असावे त्या विदाईला आपण नसतो, म्हणून ही विदाई आपल्याला फार महत्त्वाची वाटत असावी.खरे सांगायचे, तर आपण जोडले जातो फक्त देहाशी. देहच ओळख, सर्वस्व असतो आपल्यासाठी. जोवर देह समोर असतो, तोवर बंध निर्माण होतात. देहाचा नाश झाला की, आपल्याला वाटते झाला शेवट, संपले सारे काही. तसे ते खोटेही नसते. बघा नं युद्धाचा शेवट शत्रूच्या देहनाशातच होतो. नष्ट झालेला शत्रूचा देह विजयाची ज्योत जागवितो. एखाद्या गुन्हेगाराला दिलेली सर्वोच्च शिक्षा देहनाशाचीच असते. देहनाशाने प्रश्न सुटतो का, हा प्रश्न अलाहिदा, पण तो शत्रू संपतो एवढे मात्र नक्की. जी गोष्ट शत्रू संबंधात असते, तीच मित्राबाबत, प्रियजनाबाबत असते. त्यांचा संपलेला देह यातना, वेदना देतो व विव्हल करतो. त्यांचा आत्मा अमर आहे, हे समाधान करून घेतानासुद्धा देहनाशाचे दु:ख जिवाला जाळत राहते. जर आत्मा अमर आहे, असे आपण मानत असू, तर हा शोक व्यर्थचा नाही का?मला वाटते, त्याचे कारण हे असावे की, आपल्या त्या व्यक्तीशी जोडलेल्या भावभावना, संबंध, नाते, हेवेदावे सारे काही त्याच्या देहासोबत जळून जात असावेत व राहत असाव्यात फक्त एकांगी आठवणी - त्यात नवीन भर न पडणाऱ्या आठवणी. त्यामुळेच ती अंतिम विदाई असावी, त्याच्या देहाची आणि त्या व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या आपल्या स्मृतीची. अचानक माझ्या ध्यानात आले.. त्याच्या त्या देहासोबत माझ्याही व्यक्तित्त्वाचा एक हिस्सा जळत होता. अगदी माझ्याही नकळत, जो जोडला गेला होता त्याच्याशी. परंतु जिथे आपला काहीही संबंध नसतो, अशा एखाद्या तिऱ्हाईताचा चितेवर जळणारा देह पाहून, आपण का जळत असतो? मला वाटते, जळण्याची ती क्रिया कोठेतरी ही जाणीव देत असते, आपण ज्वलनशील आहोत, नश्वर आहोत याची. कळत-नकळत आपण पाहत असतो आपल्यालाच त्या चितेवर; आपुले जळणे पाहिले म्यां डोळा.