शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

अंतिम विदाई

By admin | Updated: July 2, 2017 01:30 IST

विवेक माझा मित्र. चितेवर त्याचा देह चढविताना खूपच वजनदार झाला. चितेवर चढलेल्या वा चढविलेल्या त्याच्या देहाला डोळाभर न्याहळत असताना, कोणीतरी

- डॉ. नीरज देव  विवेक माझा मित्र. चितेवर त्याचा देह चढविताना खूपच वजनदार झाला. चितेवर चढलेल्या वा चढविलेल्या त्याच्या देहाला डोळाभर न्याहळत असताना, कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर मोठे लाकडाचे खोड ठेवले व त्याचा चेहरा दिसेनासा झाला. त्या लाकडांमध्ये आता काष्ठवत् झालेला त्याचा देह; देहरूपी काष्ठ काष्ठातच दाबले गेले, चिता पेटविली गेली. तो दाह बसताच, मी झटकन मागे सरकलो. विचारांचे आवर्तन सुरू झाले. आज मी चटकन बाजूला सरकलो, तरी पुढे केव्हातरी मीही अशीच आगीची शाल लपेटून झोपणार.. तेवढ्यात शब्द कानावर आदळले अंतिम विदाई. अखेरचा निरोप! अंतिम विदाई? अरे, येथे तर फक्त मृतदेह आहे. काष्ठवत लाकडासारखा त्याला लाकडात रचणे ही का असते अंतिम विदाई? देह मोठा की आत्मा-देहातील चैतन्य? जर उत्तर चैतन्य असेल, तर ते जेव्हा जाते, त्याच वेळी खरी अंतिम विदाई झालेली असते. त्या वेळी कोण जवळ असेल-नसेल सांगता येत नाही. हे तर केवळ उपचार झाले देहाला मिटवायचे. मृत्यूचा न्याय सारखा असतो. आपले उपचार असतात वेगळे. मग अंतिम विदाई याला कसे म्हणायचे? कदाचित, असे असावे त्या विदाईला आपण नसतो, म्हणून ही विदाई आपल्याला फार महत्त्वाची वाटत असावी.खरे सांगायचे, तर आपण जोडले जातो फक्त देहाशी. देहच ओळख, सर्वस्व असतो आपल्यासाठी. जोवर देह समोर असतो, तोवर बंध निर्माण होतात. देहाचा नाश झाला की, आपल्याला वाटते झाला शेवट, संपले सारे काही. तसे ते खोटेही नसते. बघा नं युद्धाचा शेवट शत्रूच्या देहनाशातच होतो. नष्ट झालेला शत्रूचा देह विजयाची ज्योत जागवितो. एखाद्या गुन्हेगाराला दिलेली सर्वोच्च शिक्षा देहनाशाचीच असते. देहनाशाने प्रश्न सुटतो का, हा प्रश्न अलाहिदा, पण तो शत्रू संपतो एवढे मात्र नक्की. जी गोष्ट शत्रू संबंधात असते, तीच मित्राबाबत, प्रियजनाबाबत असते. त्यांचा संपलेला देह यातना, वेदना देतो व विव्हल करतो. त्यांचा आत्मा अमर आहे, हे समाधान करून घेतानासुद्धा देहनाशाचे दु:ख जिवाला जाळत राहते. जर आत्मा अमर आहे, असे आपण मानत असू, तर हा शोक व्यर्थचा नाही का?मला वाटते, त्याचे कारण हे असावे की, आपल्या त्या व्यक्तीशी जोडलेल्या भावभावना, संबंध, नाते, हेवेदावे सारे काही त्याच्या देहासोबत जळून जात असावेत व राहत असाव्यात फक्त एकांगी आठवणी - त्यात नवीन भर न पडणाऱ्या आठवणी. त्यामुळेच ती अंतिम विदाई असावी, त्याच्या देहाची आणि त्या व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या आपल्या स्मृतीची. अचानक माझ्या ध्यानात आले.. त्याच्या त्या देहासोबत माझ्याही व्यक्तित्त्वाचा एक हिस्सा जळत होता. अगदी माझ्याही नकळत, जो जोडला गेला होता त्याच्याशी. परंतु जिथे आपला काहीही संबंध नसतो, अशा एखाद्या तिऱ्हाईताचा चितेवर जळणारा देह पाहून, आपण का जळत असतो? मला वाटते, जळण्याची ती क्रिया कोठेतरी ही जाणीव देत असते, आपण ज्वलनशील आहोत, नश्वर आहोत याची. कळत-नकळत आपण पाहत असतो आपल्यालाच त्या चितेवर; आपुले जळणे पाहिले म्यां डोळा.