शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

ब्रिटिशकालीन रेल्वे बोगदा मोजतोय अखेरची घटका

By admin | Updated: August 23, 2016 05:52 IST

१६० वर्षांपूर्वीच्या रेल्वे बोगद्याकडे मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना घडून अनेक प्रवाशांचे जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

आसनगाव : महाड येथील दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने ब्रिटिशकालीन पुलांचे पाहणीसत्र सुरू केले असले तरी वासिंद रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या १६० वर्षांपूर्वीच्या रेल्वे बोगद्याकडे मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना घडून अनेक प्रवाशांचे जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या बोगद्यावरून दररोज शेकडो लोकल व एक्स्प्रेस गाड्या जात असल्याने स्थानिकांनी भीती व्यक्त करत आहे. हा रेल्वेमार्ग ब्रिटिशांनी १८५४ मध्ये तयार केला. त्यानंतर, १८५५ ला पहिली रेल्वे वासिंद रेल्वे स्थानकात आली होती. रेल्वेमार्गावरील पाणी वाहून जाण्यासाठी हा बोगदा तयार केला. तथापि, मुरबाड, कल्याण तालुक्याला जोडणारे वासिंद स्थानकाबाहेरील रेल्वेमार्गावरील फाटक ( क्र . ६२ ) २२ वर्षांपूर्वी बंद केल्याने रस्त्यावरील वाहतूक पुढे याच बोगद्यातून वळवण्यात आली. आजही या बोगद्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्यांच्यादेखील जीवाला धोका आहे. २००२ मध्ये या बोगद्याच्या आतील काही भाग पडला होता. त्या वेळेस तेथे सिमेंट व दगडाचा तात्पुरता लेप लावण्यात आला होता. आजही संपूर्ण वासिंद शहराचे सांडपाणी याच बोगद्यावाटे बाहेर पडत असल्याने त्याची जमिनीखालील बाजू कमकुवत झाली आहे. तसेच वरील बाजूनेही गळती सुरू आहे. काही ठिकाणी बांधकामाचे दगडदेखील पडले आहेत. या बोगद्याच्या वरील भागातून रेल्वे, तर खालील भागातून रस्ते वाहतूक सुरू असल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे ६२ क्रमांकाचे रेल्वेचे फाटक पुन्हा सुरू करून रस्ते वाहतूक सुरू करण्याची मागणी आहे.