शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईमध्ये उभारणार राज्यातील सर्वांत मोठी पोलीस वसाहत

By admin | Updated: April 2, 2017 01:44 IST

पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या वर्षभरात पोलिसांसाठी महाराष्ट्रात ३६ हजार घरे बांधण्यात येणार आहेत

नवी मुंबई : पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या वर्षभरात पोलिसांसाठी महाराष्ट्रात ३६ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी सर्वात मोठी पोलीस वसाहत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.कर्तृत्ववान पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी, ‘लोकमत’च्या वतीने ‘आउटस्टँडिंग पोलीस अवॉर्ड’ हा सोहळा वाशीतील रघुलीला आर्केडच्या इम्पेरिअल हॉलमध्ये शुक्रवारी पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केसरकर बोलत होते. या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील २८ कर्तृत्ववान पोलीस अधिकारी अणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. एखाद्या माध्यम समुहाकडून पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ होती. या कार्यक्रमाला नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, निवृत्त अपर पोलीस महासंचालक रामराव वाघ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.राज्य सरकारने पोलिसांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. पोलिसांना अतिरिक्त कामांसाठी अतिरिक्त मोबदला देण्याचा निर्णय झाल्याची माहिती केसरकर यांनी या वेळी दिली. पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न गंभीर आहे. सध्या २ लाख २५ हजार पोलीस कर्मचारी आहेत, तर उपलब्ध घरांची संख्या केवळ ८६ हजार इतकी आहे. येत्या काळात ९० हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी या वर्षात ३६ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. घरांच्या निर्मितीला एक-दोन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने ते राहात असलेल्या पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. अगोदर पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काचे घर देण्यासाठी ८.५ टक्के व्याजदराने गृहकर्जाचा पुरवठा केला जात होता. मात्र, आता घरखरेदीसाठी थेट बँकांकडून कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. बँकांचा व्याजदर अधिक असला, तरी हा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यासाठी तब्बल ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे केसरकर यांनी या वेळी सांगितले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वप्रथम समाजाची मानसिकता बदलायला हवी. हे काम काहीसे अवघड असले, तरी सोशल इंजिनीअरिंगच्या माध्यमातून ते सुकर करता येईल. यात पोलिसांची जबाबदारी मोठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, महापौर सुधाकर सोनावणे तसेच नवी मुंबईतील शेकडो मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. (प्रतिनिधी)