शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

राज्यात महामार्गांचा मोठा विस्तार

By admin | Updated: November 6, 2015 01:32 IST

महाराष्ट्रातील ३८३९ किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिलेली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ३८३९ किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिलेली आहे. या सोबतच नागपूर-मुंबई दरम्यानच्या प्रस्तावित सहा पदरी एक्सप्रेस वेसाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांनी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे, तसेच प्रस्तावित चौपदरी मुंबई-गोवा एक्सप्रेस मार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या मार्गातील अडचणीही दूर झाल्या आहेत.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम, सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यासाठी गडकरी यांनी स्वत: पुढाकार घेतला होता. या संदर्भातील आदेश पुढच्या आठवड्यात जारी केला जाईल. या निर्णयामुळे ३८३९ किलोमीटरच्या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे असेल आणि राज्य सरकारला त्यासाठी खर्च करावा लागणार नाही. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या महामार्गांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. सध्या महाराष्ट्रात ७०३५ किलोमीटर लांबीचे राज्य महामार्ग व ३५७५४ किलोमीटरचे सामान्य महामार्ग आहेत.मुंबई-गोवा कोस्टल रोडमुंबई आणि गोवादरम्यान कोस्टल रोड बनविण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मार्गावर अंदाजे २००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या शिवाय मुंबई आणि बडोदादरम्यान सहा पदरी एक्सप्रेस वेसाठी लवकरच विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.१० हजार कोटींचे रस्ता प्रकल्प‘पुढील महिन्यात आमचे सरकार १० हजार कोटींचे रस्ते प्रकल्प घोषित करण्याची शक्यता आहे,’ असे सांगून पाटील म्हणाले, ‘यावर्षी राज्याला केंद्राकडून केंद्रीय रस्ता निधीमधून ४०३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आधी केवळ २०० कोटी मिळायचे, परंतु आमच्या सरकारने रस्त्यांसाठी २८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद वाढवून, ती ३७०० कोटी रुपये केली आहे. त्यामुळे राज्यातील रस्त्यांच्या स्थितीत लवकरच सुधारणा होईल.’नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वे : लवकरच डीपीआरनागपूर-मुंबई एक्स्प्रेस वेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या करारानुसार, दोन महिन्यांच्या आत विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सध्या ३२ हजार कोटी रुपये आहे. पुढील साडेतीन ते चार वर्षांत हा मार्ग तयार करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.मुंबई-गोवा एक्स्प्रेस वेमुंबई-गोवा चौपदरी एक्सप्रेस वेसाठी रायगड जिल्ह्याच्या पनवेल आणि इंदापूरदरम्यानची जमीन अधिग्रहित करण्याच्या मार्गात ज्या अडचणी येत होत्या, त्या आता दूर झाल्या आहेत. सर्व प्रकारच्या मंजुरी मिळालेल्या आहेत. त्यामुळे इंदापूर आणि झारपदरम्यान काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील या महामार्गासाठी ५० टक्के जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.