शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

जिरायती भागात दडी

By admin | Updated: June 30, 2016 01:42 IST

पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

काऱ्हाटी : पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवायचा, व जिवापाड सांभाळलेली जनावरे कशी वाचवायची, या विचाराने शेतकरी चिंतेत पडला आहे. पावसाळ्यातच ‘जनाई-शिरसाई’ योजनेतून बंधारे, पाझर तलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.हमखास समजला जाणारा खरीप हंगाम काऱ्हाटी, माळवाडी, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, फोंडवाडा, देऊळगाव रसाळ भागात वाया गेला आहे. तसेच, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, जनावरांचा चारा कसा घ्यायचा, याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. शेतकरी सगळीकडून आर्थिक अडचणीत सापडला आहे. बारामतीच्या पश्चिम भागातील अांबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी, फोंडवाडा, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, लोणकरमळा, अंजनगाव, कऱ्हावागज, नेपत वळण, बऱ्हाणपूर भागात कऱ्हा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत.>मेंढपाळांसाठी घर कोसो दूरलोणी भापकर : पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही बारामती तालुक्याचा ग्रामीण भाग अद्याप कोरडाच आहे. त्यातही तालुक्याच्या जिरायती भागातील पाणी आणि चाऱ्याची स्थिती अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र आहे. पावसाने दडी मारल्याने सहा महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या येथील मेंढपाळवर्गासाठी अद्याप गाव आणि घर कोसो दूरच आहे. त्यामुळे सध्या अनेक मेंढपाळ बारामती शहाराच्या सभोवताली पालं टाकून पर्जन्यराजाची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येते. बारामती तालुक्यातील उत्तर-पश्चिम पट्ट्यातील जोगवडी, पळशी, मोराळवाडी, मोढवे, मुर्टी, कानाडवाडी, लोखंडवाडी, सस्तेवाडी, मुढाळे, मासाळवाडी, तर सुपे परगण्यातील बाबुर्डी, पानसरेवाडी, दंडवाडी, वढाणे या भागातील अनेक कुटुंबे शेळी-मेंढीपालन व्यवसायात आहेत. क्षारयुक्त पाणीपाऊस पडत नसल्याने घोर लागला आहे. जनावरांसाठी चारा पिके घेता आली नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चांगले पाणी नसल्यामुळे क्षारयुक्त पाणी जनावरांना पाजावे लागत आहे. परिणामी दूध उत्पादनात घट झाली आहे. खरीप हंगाम वाया गेल्यामुळे सलग चौथ्या वर्षीही दुष्काळ पडला आहे. सततची पाणी टंचाई व दुष्काळ, या भागातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजला असल्याची खंत शेतकरी लालासो भोसले व भाऊसाहेब पिसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.