शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

काल माळीण, तळीये, आज इर्शाळवाडी...; जिवंत माणसांचा विचार कुणी करणार की नाही?

By प्रविण मरगळे | Updated: July 20, 2023 12:23 IST

इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची कटू आठवण ताजी झाली. डोंगरात झालेल्या मोठ्या आवाजानंतर भयाण शांतता पसरली. मातीचा ढिगारा, चिखल आणि उन्मळलेली झाडे हे विदारक चित्र पाहायला मिळाले.

प्रविण मरगळे

रायगडच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक लोक जिवंत ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सततचा कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे कुणी घराबाहेर नव्हते. रात्री जेवल्यानंतर झोपी गेलेल्या या लोकांवर आस्मानी संकट कोसळले अन् होत्याचे नव्हते झाले. इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेनंतर तात्काळ प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री तिथे पोहचले. मदतकार्यासाठी बचाव पथके दाखल खाली. सर्व यंत्रणा दुर्घटनेतील लोकांचा शोध घेऊ लागलेत. यातून काही लोक सुखरुप बचावले आहेत. परंतु, अद्यापही अनेक लोकांचा ठावठिकाणा लागत नाही. 

इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची कटू आठवण ताजी झाली. डोंगरात झालेल्या मोठ्या आवाजानंतर भयाण शांतता पसरली. मातीचा ढिगारा, चिखल आणि उन्मळलेली झाडे हे विदारक चित्र पाहायला मिळाले. जवळपास संपूर्ण गावच क्षणार्धात गायब झाले. ३० जुलै २०१४ च्या या घटनेत ४४ घरे मातीत गाडली. थरकाप उडवणाऱ्या या दुर्घटनेत १५१ लोकांचा मृत्यू झाला. आजही ही दुर्घटना आठवून अनेकांचे डोळे पाणावतात. २०२१ मध्ये रायगडच्या महाड येथील तळीये गावातही अशीच दुर्घटना घडली. पावसामुळे घरांवर दरड कोसळली. ४० हून अधिक लोक या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले. कोकणात दरवर्षी इतर विभागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडतात. इर्शाळवाडी, माळीण, तळीये यासारख्या अनेक घटना राज्यात याआधीही घडल्या आहेत. पण तात्पुरता मुलामा लावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, राज्यकर्ते पीडितांच्या मदतीसाठी धावतात. परंतु ज्यानं आपला बाप, आई, भाऊ आणि जीवाभावाची माणसं गमावली त्यांच्या नशिबी केवळ डोळ्यातील अश्रू येतात. 

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर आता खरेच विचारावे वाटते की, अजून किती बळी गेल्यावर आपल्या व्यवस्थेला, प्रशासनाला, राज्यकर्त्यांना जाग येणार? पिढ्यानपिढ्या लोक गावात राहतात. परंतु, निसर्गाला धक्का लावून, निसर्गनियमाच्या विरोधात जाऊन काही गोष्टी केल्याने अनेक ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडतायेत. इर्शाळवाडीतील दुर्घटना पाहून राज्यकर्त्यांचे डोळे उघडतील का हा खरा प्रश्न आहे. इर्शाळवाडीत ज्याभागात दरड कोसळली तो भाग डोंगराच्या उच्च माथ्यावर आहे. त्याठिकाणी कुठलेही वाहन पोहचू शकत नाही. १ ते दीड तास दुर्घटनास्थळी पोहचण्यासाठी लागतात. त्यामुळे याठिकाणी बचावपथकाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जेसीबी अन्य मशिन मदतीसाठी पाठवता येत नाही. हेलिकॉप्टरने मदत पोहचवायची झाल्यास  आजही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावात घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. सोयीसुविधा नाही.  

२०१८ मध्ये मी सिंधुदुर्गातील करूळ-केगदवाडी, अर्चिणे, द्रोणावाडी, शिराळा यासारख्या गावात गेलो होतो. त्याठिकाणी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. रस्ता नसल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. आजारपणात तर उपचारासाठी कित्येक मैल पायपीट करत दवाखाना गाठावा लागतो. आज भलेही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देश साजरा करत असेल तरी अनेक गावांची परिस्थिती आजही बिकट आहे. एकीकडे आधुनिकतेच्या दिशेने भारत पुढे जातोय, चंद्रावर पोहोचण्यासाठीही मोहीम आखली जातेय. परंतु दुसरीकडे डोंगरदऱ्यातील गावांमध्ये आजही रस्ते नाहीत, पाणी नाहीत. कुठल्याही सोयी नाहीत असे विदारक चित्र दिसून येते. 

आज इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पीडितांचा आक्रोश पाहून मन हेलावले. लहान लहान लेकरेही मातीत गाडली गेली. यातील किती माणसे जिवंत बाहेर येतील हे सांगणे कठीण आहे. परंतु, या निमित्ताने डोंगरात राहणाऱ्या माणसांचा विचार राज्यकर्ते करतील का हा प्रश्न आहे. दुर्घटना घडतात, प्रशासन जागे होते, राज्यकर्ते विचारपूस करतात पण यावर उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. लोकशाहीत प्रत्येक मत गरजेचे असते, मात्र इथं हजारो मते ढिगाऱ्याखाली जिवंत गाडली जात आहेत. राज्यातील डोंगरदऱ्यात राहणाऱ्या माणसांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. नाहीतर काल माळीण, तळीये होते, आज इर्शाळवाडी आहे अन् उद्या अन्य कुठलं तरी गाव असेल....आपण केवळ आदरांजली देण्याचं काम करत राहू.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणlandslidesभूस्खलन