शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 46 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 07:02 IST

दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला.

शिमला : ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात हिमाचल प्रदेशमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरून जाणा-या राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला. रात्री उशीरापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू होते. बेपत्ता असलेल्यांची संख्या मोठी असल्याने मृतांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल वेदना झाल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले.दरडी कोसळल्या व त्यामुळे मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग १५४ च्या कोत्रुपी खेड्यातील १०० मीटर भागाची हानी झाली. या महामार्गावरून एक बस मनाली येथून कटरा तर दुसरी चांभा येथून मनालीला निघाली होती. या दोन्ही बस हिमाचल प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या होत्या. दरडी कोसळल्यामुळे रस्ता वाहून गेला व त्यामुळे बसगाड्या ८०० मीटर खोल दरीत कोसळल्या. एक बस तर दरडीखाली पूर्णपणे गाडली गेल्यामुळे तिचा रात्री उशीरापर्यंत शोध लागला नव्हता. या बसमध्ये तब्बल ५० प्रवासी होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी अधिकाºयांसह घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले की, सर्वांना बाहेर काढेपर्यंत मदतकार्य सुरू राहील. पाच जखमींना मंडी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. (वृत्तसंस्था)।मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आरोग्यमंत्री कौल सिंग ठाकूर, परिवहन मंत्री जीएस बाली आणि ग्रामविकास मंत्री अनिल शर्मा यांनीही घटनास्थळी भेट दिली. आरोग्यमंत्री ठाकूर यांनी मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर परिवहन मंत्र्यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.>४५ मृतदेह बाहेर काढण्यात यशरात्री उशिरापर्यंत मनालीकडे जाणाºया बसमधून ४२ तर कटराकडे जाणाºया बसमधून तीन मृतदेह असे ४५ मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. त्यापैकी २३ मृतदेहांची ओळख पटली आहे. त्यात सनी कुमार या बाइकरचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.>250मीटरचा संपूर्ण परिसर मलब्याखाली गाडला गेला असून, त्यात दोन वाहने आणि अनेक घरे अडकली आहेत. त्यात अनेक जण गाडले गेले असण्याची भीती आहे. महामार्ग बंद करण्यात आला आहे.