शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 46 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 07:02 IST

दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला.

शिमला : ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात हिमाचल प्रदेशमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरून जाणा-या राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला. रात्री उशीरापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू होते. बेपत्ता असलेल्यांची संख्या मोठी असल्याने मृतांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल वेदना झाल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले.दरडी कोसळल्या व त्यामुळे मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग १५४ च्या कोत्रुपी खेड्यातील १०० मीटर भागाची हानी झाली. या महामार्गावरून एक बस मनाली येथून कटरा तर दुसरी चांभा येथून मनालीला निघाली होती. या दोन्ही बस हिमाचल प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या होत्या. दरडी कोसळल्यामुळे रस्ता वाहून गेला व त्यामुळे बसगाड्या ८०० मीटर खोल दरीत कोसळल्या. एक बस तर दरडीखाली पूर्णपणे गाडली गेल्यामुळे तिचा रात्री उशीरापर्यंत शोध लागला नव्हता. या बसमध्ये तब्बल ५० प्रवासी होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी अधिकाºयांसह घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले की, सर्वांना बाहेर काढेपर्यंत मदतकार्य सुरू राहील. पाच जखमींना मंडी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. (वृत्तसंस्था)।मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आरोग्यमंत्री कौल सिंग ठाकूर, परिवहन मंत्री जीएस बाली आणि ग्रामविकास मंत्री अनिल शर्मा यांनीही घटनास्थळी भेट दिली. आरोग्यमंत्री ठाकूर यांनी मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर परिवहन मंत्र्यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.>४५ मृतदेह बाहेर काढण्यात यशरात्री उशिरापर्यंत मनालीकडे जाणाºया बसमधून ४२ तर कटराकडे जाणाºया बसमधून तीन मृतदेह असे ४५ मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. त्यापैकी २३ मृतदेहांची ओळख पटली आहे. त्यात सनी कुमार या बाइकरचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.>250मीटरचा संपूर्ण परिसर मलब्याखाली गाडला गेला असून, त्यात दोन वाहने आणि अनेक घरे अडकली आहेत. त्यात अनेक जण गाडले गेले असण्याची भीती आहे. महामार्ग बंद करण्यात आला आहे.