शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

भूमिहीन मजुरांनीही घेतली शहराकडे धाव

By admin | Updated: May 17, 2016 03:40 IST

राज्यातील दुष्काळाचे संकट, पावसावर आधारीत शेती, भूमिहीन, स्थानिक रोजगारांच्या संधी न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शहराकडे धाव घेतली

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- राज्यातील दुष्काळाचे संकट, पावसावर आधारीत शेती, भूमिहीन, स्थानिक रोजगारांच्या संधी न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शहराकडे धाव घेतली आहे. उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या राज्याच्या पोशिंद्यावर आत्महत्येची वेळ आली असून दुसऱ्याच्या शेतावर काम करणाऱ्या मजुरांनी कसे घर चालवायचे, असा प्रश्न समोर उभा राहिल्याची प्रतिक्रिया विदर्भातील किशोर पवार यांनी दिली. गावाकडे उपासमारीची वेळ आल्याने कुटुंबासोबत नवी मुंबई स्थलांतर केलेल्या पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना मिळेल ते काम करून दोन वेळच्या जेवणाची सोय करीत असून, कसाबसा संसाराचा गाडा ओढत असल्याचे सांगितले.बेलापूर परिसरातही २०हून अधिक कुटुंबे स्थलांतरित झाली असून, दुष्काळाची झळ सोसणे मुश्कील झाल्याने गाव सोडून शहराची वाट धरली आहे. या कुटुंबीयांनी आपल्या चिमुकल्यांबरोबर ठिकठिकाणी उघड्यावर संसार थाटला असून, शहरातही अनेक समस्यांशी झुंजावे लागत असल्याची प्रतिक्रिया या स्थलांतरित कुटुंबीयांनी व्यक्त केली. अनेकवेळा लाठीमार करून उठविले जात असून, मग आम्ही राहायचे कुठे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. आम्ही झोपड्या बांधून राहत नाही, पण जिथे झोपण्यापुरता जागा मिळेल तिथे आम्ही आमच्या कुटुंबाची सोय करतो; तरीदेखील आम्हाला प्रत्येक परिसरातून हाकलण्यात येथे. शहरातील नागरिक तसेच तिथल्या प्रशासनाला आम्हाला कसलाही त्रास द्यायचा नसतो, पण आम्हाला एखादी जागा मिळवून दिली दर पावसाळ्यापर्यंत तरी आमच्या पोराबाळांना उघड्यावर राहावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या जयहिंद पवार यांनी व्यक्त केली. बांधकाम, वीटभट्टी, खाणकाम अशी कामे करून शहरात रोजगार मिळवतो, परंतु रोजच्या रोज हाताला काम मिळत नसल्याने कुटुंबाची उपासमार होते. महागाई वाढल्याने दोन वेळची भूक भागविण्यासाठीही दिवसभर कामधंदा शोधत फिरावे लागते. दारोदारी जाऊन पाणी मागून तहान भागवावी लागते. तरुणांना भेडसावतेय रोजगाराची समस्यायवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यातील तरुणही नवी मुंबईत स्थलांतरीत झाले असून, शिक्षण घेऊनही बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. पदवीचा अभ्यास घेतलेल्या तरुणांनाही या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये काम करावे लागत असल्याने पोराला शिकवून काय फायदा, असाही प्रश्न येथील पवार कुटुंबीयांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. शासनाने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी कुटुंबातील बेरोजगार तरुणांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी या तरुणांनी केली आहे. तान्ही मुलं घेऊन शहराकडे धाव घेतली, पण इथही आमचे हाल होत आहेत. उघड्यावर राहिल्याने मुलांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. उपचारासाठी पैसे नसल्याने आमच्याबरोबर या लेकरांचीही फरफट होत असल्याचे अमरावती येथून आलेल्या सरिता पवार यांनी व्यक्त केली आहे. मुलाला असलेल्या आजारावर डॉक्टरांनी आॅपरेशन हा एकमेव पर्याय सांगितला असून, पैशाअभावी उपचार करता येत नसल्याचीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.