शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनी लँड माफियांच्या घशात ?

By admin | Updated: July 20, 2016 03:46 IST

वनजमीनीचा काही भाग खाजगी लोकांच्या घशात घालण्यासाठी वृक्षरोपणा पासून वगळला.

हितेन नाईक,

पालघर- वन महोत्सवातून राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी पालघरचे सहाय्यक वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते यांनी मात्र शिरगावच्या समुद्रालगत असलेल्या आपल्या वनजमीनीचा काही भाग खाजगी लोकांच्या घशात घालण्यासाठी वृक्षरोपणा पासून वगळला. तसेच ते वनजमीनीवर झालेल्या अतिक्रमणा आणि बेकायदेशीर बांधकामांकडेही हेतूपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.वैश्वीक उष्णतेमध्ये होणारी वाढ आणि हवामानातील बदल त्यामुळे उशीरा का होईना वृक्ष लागवड मोठया प्रमाणात करणे गरजेचे असल्याचे शासनाच्या लक्षात आले. उष्णतेची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्याचा भाग म्हणून शासनाच्या वनविभाग व जनतेच्या सहभागतून वनमहोत्सव १ जुलै २०१६ रोजी मोठा गाजावाजा करून साजरा करण्यात आला खरा. परंतु पालघरच्या सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयाकडून नंदकुमार कुप्ते यांच्या वतीने क.न. १९६८ या सुमारे २१ हेक्टर क्षेत्रावर १ जुलै रोजी ३७ हजार वृक्षरोपण करण्यात आली. मात्र हे वृक्षरोपण करतांना काही खाजगी लोकांच्या फायद्यासाठी एक मोठे क्षेत्र वृक्षरोपणापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रार शिरगावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी पालघरच्या सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयाकडे ५ लाख ९ हजार ७५२ रू. चा निधी आला असून संरक्षीत वन क्षेत्राला कुंपण घालण्याचे आदेश वनविभागाकडून देण्यात आले आहेत. समुद्राकडील बंदरविभागाच्या जागेवरून म्हणजे सध्या मुक्त असलेल्या जागेवर कुंपण घालून अतिक्रमण धारकाना मोकळे सोडण्याची भूमिका नंदकुमार कुप्ते घेत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशयही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्याकडे व्यक्त केला केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी बांगर यांनी उपवनसंरक्षक, डहाणू एन एस लडकत यांना स्पष्टपणे सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात पालघरचे सहाय्यक वनसंरक्षक कुप्ते यांच्याशी मोबाईलवरून अनेक वेळा संपर्क करूनही त्यांचा फोन लागला नाही. (प्रतिनिधी) >अतिक्रमण करुन आलिशान बंगले ; वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेकशिरगाव-सातपाटीच्या समुद्र किनाऱ्यावर वनविभागाच्या राखीव वनक्षेत्र हे सुमारे २१ हजार हेक्टर जागेवरून १९६५ साली सुरूच्या झाडची लागवड होऊन सुमारे एक ते दिड हजार झाडे. वनविभागाने १९८५ ते ९० च्या दरम्यान कापून टाकली होती. त्यानंतर या रिकाम्या जागेवर २५ वर्षात वृक्षरोपण करण्याचे वनविभागाने टाळल्यामुळे या समुद्र किनाऱ्यावरील मोक्याच्या जागेवर काही स्थानिकांनी अतिक्रमणे करून खुंटे रोवले आहेत. त्यामुळे वनविभागाने मुळ कागदपत्राच्या आधारे आपल्या जागेचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. अनेक वर्षापासून हे सर्वेक्षण न करता काही स्थानिकांना नोटीसा पाठवून आपण कार्यवाही केल्याचे दाखवून वरिष्ठाच्या डोळयात धूळ फेकण्याचे काम पालघरचे सहाय्यक वनसंरक्षक करीत आहेत. त्यामुळे सातपाटी-शिरगावच्या रस्त्यापलीकडील (पश्चिमेकडील) वनविभागाच्या जागेवर अनधिकृत बंगले व वसाहती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. वनविभगाच्या जागेवर आमदार फंडातून स्मशानभूमी बांधली जात असताना ते रोखण्यासही वनविभाग अपयशी ठरल्याने ग्रामस्थांनी सांगितले.