शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सहा जिल्ह्यांतील जमिनींची पुनर्मोजणी

By admin | Updated: June 23, 2017 02:38 IST

डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत राज्यातील शेत जमिनींची पुनर्मोजणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत राज्यातील शेत जमिनींची पुनर्मोजणी केली जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे जमिनींचे मोठ्या प्रमाणावर हस्तांतरण झालेले असून, विक्री तसेच वारसांमुळे जमिनींची विभागणी झाल्याने अनेक तुकड्यांमध्ये जमिनी विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यामध्ये मेळ राहिला नसल्याने अनेकदा वाद निर्माण होतात. अनेक जमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी न झाल्याने एकाच सातबारा उताऱ्यावर अनेक जणांच्या नावांची नोंद असते. बहुतांश ठिकाणी मूळ भूमापन अभिलेख जीर्ण झालेले आहेत. जमिनीमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, सिंचन सुविधा वाढल्याने, धारण क्षेत्र कमी होत गेल्याने मूळ मोजणीवेळी उभारलेली भूमापन चिन्हे, हद्दीच्या निशाण्या अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. त्यामुळे जमिनीच्या सरबांधाविषयी (हद्द) वाद निर्माण होत आहेत. यासंबंधी निर्णय देताना अडचणीही येतात. या सर्व बाबींचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राज्यातील ग्रामीण भागातील जमिनींची पुनर्मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निविदा मागवल्यापहिल्या टप्प्यातील सहा जिल्ह्यांसाठी २९३ कोटी ६१ लाखांच्या खर्चाला मान्यताही दिली आहे. त्यासाठी ई टेंडरिंग पद्धतीने निविदा मागविल्या असून, त्यांचे तांत्रिक मूल्यमापन करण्यासाठी जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली निविदा मूल्यमापन समिती तसेच अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीत सुकाणू व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.