शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

सहा जिल्ह्यांतील जमिनींची पुनर्मोजणी

By admin | Updated: June 23, 2017 02:38 IST

डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत राज्यातील शेत जमिनींची पुनर्मोजणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत राज्यातील शेत जमिनींची पुनर्मोजणी केली जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे जमिनींचे मोठ्या प्रमाणावर हस्तांतरण झालेले असून, विक्री तसेच वारसांमुळे जमिनींची विभागणी झाल्याने अनेक तुकड्यांमध्ये जमिनी विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यामध्ये मेळ राहिला नसल्याने अनेकदा वाद निर्माण होतात. अनेक जमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी न झाल्याने एकाच सातबारा उताऱ्यावर अनेक जणांच्या नावांची नोंद असते. बहुतांश ठिकाणी मूळ भूमापन अभिलेख जीर्ण झालेले आहेत. जमिनीमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, सिंचन सुविधा वाढल्याने, धारण क्षेत्र कमी होत गेल्याने मूळ मोजणीवेळी उभारलेली भूमापन चिन्हे, हद्दीच्या निशाण्या अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. त्यामुळे जमिनीच्या सरबांधाविषयी (हद्द) वाद निर्माण होत आहेत. यासंबंधी निर्णय देताना अडचणीही येतात. या सर्व बाबींचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राज्यातील ग्रामीण भागातील जमिनींची पुनर्मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निविदा मागवल्यापहिल्या टप्प्यातील सहा जिल्ह्यांसाठी २९३ कोटी ६१ लाखांच्या खर्चाला मान्यताही दिली आहे. त्यासाठी ई टेंडरिंग पद्धतीने निविदा मागविल्या असून, त्यांचे तांत्रिक मूल्यमापन करण्यासाठी जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली निविदा मूल्यमापन समिती तसेच अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीत सुकाणू व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.