शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

समृद्धी महामार्गासाठीची शेतजमीन गुलदस्त्यातच

By admin | Updated: September 3, 2016 01:37 IST

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला २० वर्षे पुढे नेणारा मुंबई ते नागपूर हा ‘महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर’ (एमएससी) हा ७१० किमीचा आहे. या महामार्गासह कृषी समृद्धी केंद्रासाठी

ठाणे : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला २० वर्षे पुढे नेणारा मुंबई ते नागपूर हा ‘महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर’ (एमएससी) हा ७१० किमीचा आहे. या महामार्गासह कृषी समृद्धी केंद्रासाठी ५१ हजार एकर शेतजमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, यापैकी ठाणे जिल्ह्यातून किती शेतजमीन संपादित करावी लागणार, हे अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शुक्रवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघड झाले.हा महामार्ग व त्यास अनुसरून असलेले प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी कसे उपयुक्त आहेत, याविषयी एमएसआरडीसीतर्फे येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. त्यात या महामार्गापासून होणाऱ्या गुणात्मक विकासासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी एमएसआरडीसीच्या लायझनिंग आॅफिसर रेवती गायकर, सुसंवाद विभागाचे राजेश देशमुख आणि शहापूर व भिवंडीचे उपविभागीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. राज्याच्या १० जिल्ह्यांतून हा महामार्ग जात असून त्यात ठाणे जिल्ह्याचादेखील समावेश आहे. ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, कल्याण या दोन तालुक्यांतून प्रत्येकी १० किमीचा हा महामार्ग असणार आहे. तर शहापूर तालुक्यातून सर्वाधिक ६० ते ६५ किमीचा तो आहे. या तिन्ही तालुक्यांतील ९८० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा त्यात समावेश आहे. मात्र, त्यातील किती एकर जमीन संपादित होणार, याची अंदाजे माहितीही जिल्हा प्रशासनासह एमएसआरडीसीकडे उपलब्ध नव्हती. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील चिंचोली व शहापूर-धसई या दोन ठिकाणी या नवनगर शहरांचा विकास होणार आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मार्गीया महामार्गावर ठिकठिकाणी भुयारी मार्ग होणार असून शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे. ठिकठिकाणी टोलनाके राहणार असून जेवढे अंतर जाणार, तेवढाच टॅक्स भरावा लागणार आहे. या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यापूर्वी जिल्ह्यातील गावकऱ्यांच्या पुनर्वसनासह प्रकल्पग्रस्तांच्या सरकारी नोकरीच्या समस्या पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ग्रामसभांचे ठराव घेऊन शेतजमिनी संपादित केल्या जातील. यासाठी ज्या तालुक्यात विरोध होईल, त्यातील शेतकऱ्यांना समज देण्यात येईल. त्यांच्या हिताची हमी लेखी स्वरूपात दिली जाईल. यानंतरही त्यांचा विरोध राहिल्यास अन्य तालुक्यांतून हा महामार्ग वळवण्याची तयारीदेखील ठेवली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या वेळी सांगितले.