शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गासाठीची शेतजमीन गुलदस्त्यातच

By admin | Updated: September 3, 2016 01:37 IST

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला २० वर्षे पुढे नेणारा मुंबई ते नागपूर हा ‘महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर’ (एमएससी) हा ७१० किमीचा आहे. या महामार्गासह कृषी समृद्धी केंद्रासाठी

ठाणे : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला २० वर्षे पुढे नेणारा मुंबई ते नागपूर हा ‘महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर’ (एमएससी) हा ७१० किमीचा आहे. या महामार्गासह कृषी समृद्धी केंद्रासाठी ५१ हजार एकर शेतजमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, यापैकी ठाणे जिल्ह्यातून किती शेतजमीन संपादित करावी लागणार, हे अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शुक्रवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघड झाले.हा महामार्ग व त्यास अनुसरून असलेले प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी कसे उपयुक्त आहेत, याविषयी एमएसआरडीसीतर्फे येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. त्यात या महामार्गापासून होणाऱ्या गुणात्मक विकासासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी एमएसआरडीसीच्या लायझनिंग आॅफिसर रेवती गायकर, सुसंवाद विभागाचे राजेश देशमुख आणि शहापूर व भिवंडीचे उपविभागीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. राज्याच्या १० जिल्ह्यांतून हा महामार्ग जात असून त्यात ठाणे जिल्ह्याचादेखील समावेश आहे. ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, कल्याण या दोन तालुक्यांतून प्रत्येकी १० किमीचा हा महामार्ग असणार आहे. तर शहापूर तालुक्यातून सर्वाधिक ६० ते ६५ किमीचा तो आहे. या तिन्ही तालुक्यांतील ९८० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा त्यात समावेश आहे. मात्र, त्यातील किती एकर जमीन संपादित होणार, याची अंदाजे माहितीही जिल्हा प्रशासनासह एमएसआरडीसीकडे उपलब्ध नव्हती. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील चिंचोली व शहापूर-धसई या दोन ठिकाणी या नवनगर शहरांचा विकास होणार आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मार्गीया महामार्गावर ठिकठिकाणी भुयारी मार्ग होणार असून शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे. ठिकठिकाणी टोलनाके राहणार असून जेवढे अंतर जाणार, तेवढाच टॅक्स भरावा लागणार आहे. या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यापूर्वी जिल्ह्यातील गावकऱ्यांच्या पुनर्वसनासह प्रकल्पग्रस्तांच्या सरकारी नोकरीच्या समस्या पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ग्रामसभांचे ठराव घेऊन शेतजमिनी संपादित केल्या जातील. यासाठी ज्या तालुक्यात विरोध होईल, त्यातील शेतकऱ्यांना समज देण्यात येईल. त्यांच्या हिताची हमी लेखी स्वरूपात दिली जाईल. यानंतरही त्यांचा विरोध राहिल्यास अन्य तालुक्यांतून हा महामार्ग वळवण्याची तयारीदेखील ठेवली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या वेळी सांगितले.