शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभुधारकांच्या जमिनी सिंचनाखाली !

By admin | Updated: November 13, 2015 02:12 IST

सिंचन कामांवर रोहयोचा भर; राज्यात ७९ हजार विहिरींची कामे प्रगतीपथावर.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर/(जि.बुलडाणा): राज्यात सन २0१४-१५ मध्ये रोहयोतून २0 हजार ४११ विहिरींची कामे पूर्ण झाली आली असून, ७९ हजार १३८ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. याममुळे राज्यातील हजारो अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या जमीनी सिंचनाखाली आल्या आहेत. जवाहर विहीर कार्यक्रम राज्य रोहयोंतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ च्या कलम १२ (ई) अन्वये राज्यात सन १९९९ पासून हाती घेण्यात आला आहे. राज्यातील ओलितीचे क्षेत्र वाढवून शेतकर्‍यांना बळकटी देण्यासाठी तसेच दुष्काळसदृश्य परिस्थीतीवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे व जिरविणे त्याचबरोबर पाण्याचा उपसा करून सिंचन करणे आदी कामांवर रोजगार हमी योजनेतून भर दिला जात आहे. राज्यात सन २0१४-१५ मध्ये २0 हजार ४११ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत. तर ७९ हजार १३८ कामे चालू आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात ४५ विहिरींची कामे पूर्ण व २६ हजार ६ विहिरींची कामे चालू आहेत. विदर्भातील १५३४ विहिरींची कामे अपूर्ण! विदभार्तील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी २00६ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना एक लाखापर्यंत अनुदान दिले जात होते. २३ जानेवारी २0१४ च्या शासन निर्णयानुसार धडक सिंचन विहीर योजनेतील अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थिीती रोहयोच्या धडक सिंचन विहीर या योजनेंतर्गत विदर्भातील सहा जिल्ह्यात ३५ हजार ९८५ विहीरी पूर्ण झाल्या असून, एक हजार ५३४ विहिरींची कामे अद्यापही अपूर्णच आहेत. ह्या अपूर्ण विहिरी ३0 जून २0१६ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत.