शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जमीन मोजणी पथक फिरकलेच नाही !

By admin | Updated: March 11, 2017 02:35 IST

समृद्धी महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध कायम; १४ मार्चला पार पाडली जाणार जमीन मोजणीची प्रक्रिया

वाशिम, दि. १0- नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन-वे अर्थात समृद्धी महामार्ग निर्मितीची प्रक्रिया सद्या वेगात सुरू असून यासाठी लागणार्‍या १५00 हेक्टर जमिनीपैकी सुमारे १५२ एकर जमीनीची शुक्रवार, १0 मार्चला मोजणी होणार होती. तशाप्रकारच्या नोटिसा देखील शेतकर्‍यांना गुरूवारी देण्यात आल्या. मात्र, नियोजित स्थळी शेतकरी दिवसभर उपस्थित असताना जमीन मोजणी पथक त्याठिकाणी फिरकलेच नसल्याचा प्रकार घडला.विकासाचा मार्ग म्हणून गणल्या गेलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील ४ तालुक्यांमधील ५२ गावांमधून जात आहे. यासाठी सुमारे १५00 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. शेतकर्‍यांमधून मात्र या महामार्गासाठी जमीनी देण्यास विरोध अद्याप कायम असून भूसंचय आणि भूसंपादनाच्या बदल्यात मिळणार्‍या मोबदल्यासंबंधी शासनस्तरावरून जोपर्यंत ठोस धोरण अंगिकारले जात नाही, तोपर्यंत हा विरोध कायमच राहील, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. दरम्यान, उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून शेतकर्‍यांना ९ मार्चला नोटिसा देण्यात आल्या. १0 मार्चला सकाळी १0 वाजेपासून जमिनीची मोजणी होणार असून त्यासाठी संबंधितांनी उपस्थित राहण्याबाबत त्यात कळविण्यात आले होते. त्यानुसार, संबंधित जमिनधारक शेतकरी त्या-त्या नियोजित स्थळी अगदी वेळेवर हजर झाले. मात्र, जमिन मोजणी करणारे पथक अथवा महसूल खात्यातील कुठलाच अधिकारी, कर्मचारी दिवसभरात हजर झाला नाही. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रतीक्षा करून शेतकर्‍यांनी परतीचा मार्ग धरला. समृद्धी महामार्गासाठी जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांचे हित शासनाने जोपासले आहे. भूसंपादन आणि भूसंचय अशा दोन पद्धती यासाठी अंगिकारण्यात आल्या असून मिळणार्‍या फायद्यांबाबत देखील शेतकर्‍यांचे उद्बोधन करण्यात आले. बहुतांश शेतकर्‍यांना ही संकल्पना पटली. मात्र, मूळ शेतकरी वगळता इतरांमधूनच प्रक्रियेस विरोध होत असून ही बाब विकासाला बाधा पोहचविणारी ठरू शकते. तथापि, जमिन मोजणीबाबत शेतकर्‍यांना गुरूवारी नोटिसा देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी मोजणी होणार होती. परंतू ती रद्द करून ही प्रक्रिया आता १४ मार्चला राबविण्यात येणार आहे.- सुनील माळी, क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाशिम