शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन सुरू

By admin | Updated: July 14, 2017 05:00 IST

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची क्षमता असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गुरुवारी महत्त्वाचा टप्पा सुरू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची क्षमता असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गुरुवारी महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या थेट खरेदीला सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगणा तालुक्यातून सुरुवात झाली. सहा शेतकऱ्यांच्या जमिनी यावेळी खरेदी करण्यात आल्या.शिंदे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे. या महामार्गामुळे राज्यासह शेतकऱ्यांनादेखील समृद्धी येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीही अडचणी असल्यास त्यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ हजार कोटींचा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे कार्य सुरू आहे. जमीन खरेदीचा ऐतिहासिक टप्पा हिंगणा तहसील कार्यालयात शेतकरी व मंत्र्यांच्या संवादाने सुरू झाला. पहिल्या काही खरेदीखतांवर साक्षीदार एकनाथ शिंदे आणि ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी १२० शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यासाठी इरादापत्रेही दिली.शासनाने या प्रकल्पासाठी जमिनीला आजवरचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले असून, रेडी रेकनर अथवा बाजारभाव यापेक्षा जे जास्त असेल, त्याच्या पाचपट रक्कम मोबदला म्हणून मिळणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. >उद्धव ठाकरेंच्या निर्देशांचे पालनशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला त्यांचा विरोध नाही. मात्र एकाही शेतकऱ्यावर अन्याय व्हायला नको, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या निर्देशांचेच पालन होत असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती शेतकऱ्यांकडून येणाऱ्या सूचनांवर विचार करणार असल्याचे शिंदे यांनी यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. >राम आसरे शाहूंच्या नावे पहिले खरेदीपत्रमहाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या हिंगणा तालुक्यातील २७९ शेतकऱ्यांच्या जमिनीची आवश्यकता असून कार्यक्रमाच्या वेळी सहा शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदीपत्र तयार करण्यात आले. ६ शेतकऱ्यांच्या ५.५९ हेक्टर जमिनीचे खरेदीपत्र तयार करण्यात आले व २ कोटी ६० लाख रुपयांचा मोबदला बँक खात्यात ‘आरटीजीएस’ने जमा होणार आहे. राम आसरे शाहू हे या प्रकल्पासाठी जमीन देणारे पहिले शेतकरी ठरल. त्यांच्या सव्वा हेक्टर जमिनीची शासनाने ५९ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केली. याशिवाय चंद्रा गायकवाड, सत्यभामा सोनारकर, मंदा फुलझेले, गोपाल मिसाळ-कल्पना मिसाळ यांची शेतजमिनीदेखील खरेदी करण्यात आली.>सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी भूसंपादनाच्या खरेदीपत्रावर स्वाक्षरी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हेदेखील उपस्थित होते.