शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

भूसंपादन विधेयक म्हणजे बकासुरी कायदाच - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 26, 2015 09:42 IST

- भूमी अधिग्रहण हा बकासुरी कायदा शेतक-यांचे अस्तित्व नष्ट करणारा असून शेतक-यांना देशोधडीस लावून सत्तेच्या तुंबड्या भरण्याचे काम आम्ही करणार नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ - भूमी अधिग्रहण हा बकासुरी कायदा शेतक-यांचे अस्तित्व नष्ट करणारा असून शेतक-यांना देशोधडीस लावून सत्तेच्या तुंबड्या भरण्याचे काम आम्ही करणार नाही अशा आक्रमक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकाला विरोध दर्शवला आहे. 

भूसंपादन विधेयकावरुन भाजपाला विरोधकांसोबतच एनडीएतील घटकपक्षांकडूनही विरोध होत आहे. शिवसेनेने यापूर्वीही विधेयकाला विरोध दर्शवला असला तरी गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भूसंपादन विधेयकाला जोरदार विरोध दर्शवला. शेतकरी जमिनीवर माऊलीसारखे प्रेम करतो, त्या माऊलीस आपण शेतक-यांकडून हिरावून घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले आहे. देशाचा आर्थिक व औद्योगिक विकास व्हायलाच हवा पण त्यासााठी शेतक-यांच्या बळी नको असेही त्यांनी म्हटले आहे. औद्योगिक घराण्यांसाठी विद्यमान सरकार इस्टेट एजंटची भूमिका निभावत आहे का असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.