शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आरोंदा आंदोलकांवर लाठीमार

By admin | Updated: January 8, 2015 01:44 IST

ज्या लोकांनी मते दिली, त्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचे काम येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून झाले आहे,

कुडाळ : ज्या लोकांनी मते दिली, त्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचे काम येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून झाले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीप्रकरणी बुधवारी नाव न घेता मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला.आरोंदा येथील आंदोलनकर्ते ग्रामस्थ, महिला यांच्यावर दगडफेक करून त्यांना रक्तबंबाळ करणाऱ्या कंपनीच्या लोकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसून, जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडणार, असा इशाराही कुडाळ येथे पत्रकार परिषदेत राणे यांनी दिला. जेटी बांधत असताना येथील गणपती विसर्जनाचा, येण्या-जाण्याचा मार्ग बंद होत असेल, स्थानिक मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असेल, राज्य रस्ता बंद करण्यात येत असेल, येथील बोटी नेण्याकरिता पाण्यातील खडक फोडल्याने पुराची स्थिती भविष्यात उद्भवत असेल, तर जनतेने छेडलेले आंदोलन योग्य आहे. त्यामुळे आपण जनतेच्या पाठीशी आहोत. कलमात खाडाखोड करून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना अटक करण्यात आली व हे येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे. मते देणाऱ्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचेही काम त्यांच्या सांगण्यावरून झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.