शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

मित्रपक्षांना ‘लालदिवा’? शक्यता कमीच!

By admin | Updated: June 13, 2016 07:12 IST

मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी

यदु जोशी,

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.मंत्रिमंडळाचा विस्तार २० ते २५ जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विस्तारास पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळविली आहे. मात्र, या विस्तारात रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत वा रिपाइंपैकी कोणालाही मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मत असल्याचे समजते. खोत आणि मेटे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यासही भाजपा श्रेष्ठी अनुकूल नव्हते, पण मुख्यमंत्री आणि राज्यातील काही भाजपा नेत्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर त्यांच्या नावाला वरून हिरवा झेंडा मिळाला होता. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवर झालेली निवड, धनगर समाजाचे असलेले डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर दिलेली संधी लक्षात घेता, मराठा, धनगर अशा मोठ्या समाजांमध्ये स्वत:चा प्रभाव निर्माण करण्याची भाजपाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे लहान मित्रपक्षातील मराठा, धनगर नेत्यांना मंत्रिपदे देण्याबााबत भाजपा नेतृत्व उत्सुक नाही.>नाशिक जिल्ह्याला मिळेल स्थानमंत्रिपदासाठी भाजपामध्येच इच्छुकांची मोठी गर्दी आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये जयकुमार रावळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देशमुख ही नावे पक्की मानली जातात. या शिवाय, नाशिक जिल्ह्याला या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच स्थान दिले जाईल. >महिला कोटाही वाढविला जाऊ शकतो. विस्तारामध्ये शिवसेना सहभागी झाल्यास अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते.पश्चिम विदर्भात मदन येरावार, डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून एक मराठा व एक बिगर मराठा असे स्थान दिले जाऊ शकते. बंजारा समाजाला स्थान द्यायचे ठरले, तर तुषार राठोड राज्यमंत्री होतील.मंत्रिमंडळ विस्तारामध्येही सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न भाजपाचा प्रयत्न आहे.