शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

मित्रपक्षांना ‘लालदिवा’? शक्यता कमीच!

By admin | Updated: June 13, 2016 07:12 IST

मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी

यदु जोशी,

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.मंत्रिमंडळाचा विस्तार २० ते २५ जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विस्तारास पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळविली आहे. मात्र, या विस्तारात रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत वा रिपाइंपैकी कोणालाही मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मत असल्याचे समजते. खोत आणि मेटे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यासही भाजपा श्रेष्ठी अनुकूल नव्हते, पण मुख्यमंत्री आणि राज्यातील काही भाजपा नेत्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर त्यांच्या नावाला वरून हिरवा झेंडा मिळाला होता. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवर झालेली निवड, धनगर समाजाचे असलेले डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर दिलेली संधी लक्षात घेता, मराठा, धनगर अशा मोठ्या समाजांमध्ये स्वत:चा प्रभाव निर्माण करण्याची भाजपाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे लहान मित्रपक्षातील मराठा, धनगर नेत्यांना मंत्रिपदे देण्याबााबत भाजपा नेतृत्व उत्सुक नाही.>नाशिक जिल्ह्याला मिळेल स्थानमंत्रिपदासाठी भाजपामध्येच इच्छुकांची मोठी गर्दी आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये जयकुमार रावळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देशमुख ही नावे पक्की मानली जातात. या शिवाय, नाशिक जिल्ह्याला या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच स्थान दिले जाईल. >महिला कोटाही वाढविला जाऊ शकतो. विस्तारामध्ये शिवसेना सहभागी झाल्यास अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते.पश्चिम विदर्भात मदन येरावार, डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून एक मराठा व एक बिगर मराठा असे स्थान दिले जाऊ शकते. बंजारा समाजाला स्थान द्यायचे ठरले, तर तुषार राठोड राज्यमंत्री होतील.मंत्रिमंडळ विस्तारामध्येही सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न भाजपाचा प्रयत्न आहे.