शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

मित्रपक्षांना ‘लालदिवा’? शक्यता कमीच!

By admin | Updated: June 13, 2016 07:12 IST

मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी

यदु जोशी,

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.मंत्रिमंडळाचा विस्तार २० ते २५ जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विस्तारास पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळविली आहे. मात्र, या विस्तारात रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत वा रिपाइंपैकी कोणालाही मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मत असल्याचे समजते. खोत आणि मेटे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यासही भाजपा श्रेष्ठी अनुकूल नव्हते, पण मुख्यमंत्री आणि राज्यातील काही भाजपा नेत्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर त्यांच्या नावाला वरून हिरवा झेंडा मिळाला होता. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवर झालेली निवड, धनगर समाजाचे असलेले डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर दिलेली संधी लक्षात घेता, मराठा, धनगर अशा मोठ्या समाजांमध्ये स्वत:चा प्रभाव निर्माण करण्याची भाजपाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे लहान मित्रपक्षातील मराठा, धनगर नेत्यांना मंत्रिपदे देण्याबााबत भाजपा नेतृत्व उत्सुक नाही.>नाशिक जिल्ह्याला मिळेल स्थानमंत्रिपदासाठी भाजपामध्येच इच्छुकांची मोठी गर्दी आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये जयकुमार रावळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देशमुख ही नावे पक्की मानली जातात. या शिवाय, नाशिक जिल्ह्याला या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच स्थान दिले जाईल. >महिला कोटाही वाढविला जाऊ शकतो. विस्तारामध्ये शिवसेना सहभागी झाल्यास अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते.पश्चिम विदर्भात मदन येरावार, डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून एक मराठा व एक बिगर मराठा असे स्थान दिले जाऊ शकते. बंजारा समाजाला स्थान द्यायचे ठरले, तर तुषार राठोड राज्यमंत्री होतील.मंत्रिमंडळ विस्तारामध्येही सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न भाजपाचा प्रयत्न आहे.