शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

लाल मिरचीला संजीवनी

By admin | Updated: September 18, 2014 00:50 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाल मिरचीचे भाव दुपटीवर जाण्याचे संकेत होते. पण मध्यंतरी झालेल्या पावसामुळे विदर्भात लाल मिरचीच्या पिकाला संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आले आहे.

भावावर नियंत्रण : २० ते ३०% भाववाढनागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाल मिरचीचे भाव दुपटीवर जाण्याचे संकेत होते. पण मध्यंतरी झालेल्या पावसामुळे विदर्भात लाल मिरचीच्या पिकाला संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आले आहे. त्यामुळे यावर्षी ‘तिखट’ फारसे महाग होणार नाही, अशी शक्यता आहे. देशात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेशात होते. विदर्भसुद्धा उत्पादनात आघाडीवर आहे. गुंटूरमध्ये (आंध्र प्रदेश) सध्या २५ ते २८ लाख टन मिरचीचा साठा आहे. त्यामुळे यावर्षी टंचाई जाणवणार नाही. पण मिरचीचे भाव २० ते ३० टक्के वाढीची शक्यता आहे. गेल्या वर्षी ६० रुपये किलो होते. यावर्षी भाव ७५ ते ८० रुपये किलोवर गेले आहेत. याशिवाय निर्यात थांबल्याने भाववाढीवर नियंत्रण आले आहे. सर्वात मोठा खरेदीदार पाकिस्तानमध्ये नवीन माल येणे सुरू झाले आहे. त्यामुळे निर्यात थांबली आहे, अशी माहिती मिरचीचे ठोक व्यापारी प्रकाश वाधवानी यांनी दिली. कळमन्यात आवक वाढलीविदर्भातील सर्वात मोठ्या कळमना बाजारात आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून लाल मिरचीची आवक होते. या ठोक बाजारात संपूर्ण विदर्भातून खरेदीदार येतात. शिवाय मिरचीपासून तिखट तयार करणारे उत्पादकसुद्धा याच बाजारातूनच खरेदी करतात. यंदा अंतिम टप्प्यात पाऊस आल्याने मिरचीचे भाव वाढले नाहीत. त्यामुळे चांगल्या दर्जाची मिरची महाग होणार नाही. गेल्यावर्षी मुसळधार पावसामुळे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे एकूण उत्पादन केवळ ११ लाख टनापर्यंत पोहोचले होते. आशियाई देशांमध्ये मिरचीला मागणीचीन आणि बांगला देशातून मिरचीला चांगली मागणी आहे. तज्ज्ञांनुसार गुंटूर येथील साठा नोव्हेंबरमध्ये संपू शकतो. तोपर्यंत मध्य प्रदेशातून नवीन आवक सुरू होईल. कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला साठा जानेवारीपर्यंत चालेल, अशी शक्यता आहे. यावर्षी मिरचीची निर्यात वाढीचे संकेत दिसत आहेत. थायलंडसुद्धा भारतातून मिरचीची खरेदी करीत आहे. चीनमध्ये मुसळधार पावसामुळे चांगल्या प्रतिच्या मिरचीचे पीक खराब झाले आहे. त्यामुळे त्यांची खरेदी भारतातून सुरू आहे. आतापर्यंत चीनमधून चांगली मागणी राहिली आहे.