शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

अहमदनगरमध्ये शेतातील एक लाखाचा कांदा चोरीला!

By admin | Updated: August 22, 2015 00:57 IST

देशभरात कांद्याचे दर शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना पाथरे खुर्द येथील शेतकरी भागवत निमसे यांच्या शेतामधील कांदा चाळीतून सुमारे एक लाखाचा

राहुरी (अहमदनगर) : देशभरात कांद्याचे दर शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना पाथरे खुर्द येथील शेतकरी भागवत निमसे यांच्या शेतामधील कांदा चाळीतून सुमारे एक लाखाचा दोन हजार पाचशे क्विंटल कांदा बुधवारी रात्री चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे.घाऊक बाजारात कांद्याचे सरासरी दर चार हजारांच्या पुढे गेलेले असल्याने किमान यंदा तरी चांगले पैसे होतील, अशी आशा होती. चोरट्यांनी शेतातील गहू व ट्रॅक्टरची अवजारेही चोरून नेली. चार पैसे मिळतील म्हणून साठवणूक केलेला कांदा चोरीला गेला, अशा शब्दांत निमसे यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या़ चोरीची घटना सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. कर्ज काढून बांधलेल्या चाळीमधील कांदा चोरीला गेल्याने त्याचे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वीच काळे आखाडा येथून बाळासाहेब रासने यांचा पाच हजार क्विंटल कांदा चोरीस गेला होता़ त्याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली आहे. मात्र, त्या चोरीचा अजून तपास लागलेला नसताना पुन्हा कांदा चोरीची घटना घडली आहे. सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कांद्याला प्रति क्विंटल ७ हजार ४०० रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. शुक्रवारी बाजार समितीमध्ये केवळ १३ ट्रक कांद्याची आवक झाली.सोलापूर मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाली आहे. १७ आॅगस्टला येथे प्रति क्विंटल ५ हजार ३५० रुपये दर मिळाला़ त्यानंतर सातत्याने भाव वाढत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला ७ हजार ४०० रुपये दर मिळाला. त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना होईल. कारण बाजारात अजून नवीन कांदा आलेला नाही़ गेल्या वर्षी आंध्रातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात घेतलेला कांदा ते आता बाजारात आणत आहेत़, अशी माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली.(प्रतिनिधी)