शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये शेतातील एक लाखाचा कांदा चोरीला!

By admin | Updated: August 22, 2015 00:57 IST

देशभरात कांद्याचे दर शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना पाथरे खुर्द येथील शेतकरी भागवत निमसे यांच्या शेतामधील कांदा चाळीतून सुमारे एक लाखाचा

राहुरी (अहमदनगर) : देशभरात कांद्याचे दर शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना पाथरे खुर्द येथील शेतकरी भागवत निमसे यांच्या शेतामधील कांदा चाळीतून सुमारे एक लाखाचा दोन हजार पाचशे क्विंटल कांदा बुधवारी रात्री चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे.घाऊक बाजारात कांद्याचे सरासरी दर चार हजारांच्या पुढे गेलेले असल्याने किमान यंदा तरी चांगले पैसे होतील, अशी आशा होती. चोरट्यांनी शेतातील गहू व ट्रॅक्टरची अवजारेही चोरून नेली. चार पैसे मिळतील म्हणून साठवणूक केलेला कांदा चोरीला गेला, अशा शब्दांत निमसे यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या़ चोरीची घटना सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. कर्ज काढून बांधलेल्या चाळीमधील कांदा चोरीला गेल्याने त्याचे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वीच काळे आखाडा येथून बाळासाहेब रासने यांचा पाच हजार क्विंटल कांदा चोरीस गेला होता़ त्याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली आहे. मात्र, त्या चोरीचा अजून तपास लागलेला नसताना पुन्हा कांदा चोरीची घटना घडली आहे. सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कांद्याला प्रति क्विंटल ७ हजार ४०० रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. शुक्रवारी बाजार समितीमध्ये केवळ १३ ट्रक कांद्याची आवक झाली.सोलापूर मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाली आहे. १७ आॅगस्टला येथे प्रति क्विंटल ५ हजार ३५० रुपये दर मिळाला़ त्यानंतर सातत्याने भाव वाढत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला ७ हजार ४०० रुपये दर मिळाला. त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना होईल. कारण बाजारात अजून नवीन कांदा आलेला नाही़ गेल्या वर्षी आंध्रातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात घेतलेला कांदा ते आता बाजारात आणत आहेत़, अशी माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली.(प्रतिनिधी)