शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

‘लोकमत’मुळे कर्जतकरांना मिळाले मुबलक पाणी

By admin | Updated: May 17, 2016 04:06 IST

पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला.

कर्जत : यंदा लातूरमध्ये भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला. काही वर्षांपूर्वी कर्जतकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पंधरा वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने कर्जतमध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम राबविला आणि त्यावेळी कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेचा पाठपुरावा करून दहा वर्षांपूर्वी कर्जतकरांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळवून दिले. त्यावेळी हा उपक्रम राबविला नसता तर कर्जतकरांवरही लातूरसारखी परिस्थिती ओढवली असती. कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म पुन्हा राबवावा, अशी मागणी होत आहे.१९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कर्जतची पेज नदीवरील पाणी योजना शंभर टक्के अनुदानाने मंजूर केली. त्यासाठी १४ कोटी १३ लाख रु पये निधी मंजूर करून योजनेचे काम सुरु करण्यात आले. यासाठी तत्कालीन मंत्री रवींद्र माने, आमदार देवेंद्र साटम, नगराध्यक्ष धनंजय चाचड, नगरसेवक प्रवीण गांगल आणि त्यांच्या टीमने प्रयत्न केले होते. योजनेचे सात टक्के काम झाले असताना १९९९ मध्ये सरकार बदलले आणि त्या आघाडी सरकारच्या धोरणा मुळे पाणी योजना ठप्प झाली. दीड दोन वर्षे झाली तरी योजनेचे काम पुढे जात नव्हते. २१ सप्टेंबर २००१ रोजी ‘लोकमत आपल्या दारी’ हा उपक्र म कर्जतमध्ये आयोजित करण्याचे ठरले. कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेला न्याय मिळवून देण्याचा संकल्प त्यावेळी करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. सध्या कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. त्यातील अडथळे दूर करून तो मार्गी लागल्यास कर्जतकरिता दुसरी पाणी योजना तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आंदोलने सुद्धा झाली परंतु काहीही उपयोग नाही. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म आणावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)