शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

‘लोकमत’मुळे कर्जतकरांना मिळाले मुबलक पाणी

By admin | Updated: May 17, 2016 04:06 IST

पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला.

कर्जत : यंदा लातूरमध्ये भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला. काही वर्षांपूर्वी कर्जतकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पंधरा वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने कर्जतमध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम राबविला आणि त्यावेळी कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेचा पाठपुरावा करून दहा वर्षांपूर्वी कर्जतकरांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळवून दिले. त्यावेळी हा उपक्रम राबविला नसता तर कर्जतकरांवरही लातूरसारखी परिस्थिती ओढवली असती. कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म पुन्हा राबवावा, अशी मागणी होत आहे.१९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कर्जतची पेज नदीवरील पाणी योजना शंभर टक्के अनुदानाने मंजूर केली. त्यासाठी १४ कोटी १३ लाख रु पये निधी मंजूर करून योजनेचे काम सुरु करण्यात आले. यासाठी तत्कालीन मंत्री रवींद्र माने, आमदार देवेंद्र साटम, नगराध्यक्ष धनंजय चाचड, नगरसेवक प्रवीण गांगल आणि त्यांच्या टीमने प्रयत्न केले होते. योजनेचे सात टक्के काम झाले असताना १९९९ मध्ये सरकार बदलले आणि त्या आघाडी सरकारच्या धोरणा मुळे पाणी योजना ठप्प झाली. दीड दोन वर्षे झाली तरी योजनेचे काम पुढे जात नव्हते. २१ सप्टेंबर २००१ रोजी ‘लोकमत आपल्या दारी’ हा उपक्र म कर्जतमध्ये आयोजित करण्याचे ठरले. कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेला न्याय मिळवून देण्याचा संकल्प त्यावेळी करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. सध्या कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. त्यातील अडथळे दूर करून तो मार्गी लागल्यास कर्जतकरिता दुसरी पाणी योजना तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आंदोलने सुद्धा झाली परंतु काहीही उपयोग नाही. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म आणावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)