शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मुळे कर्जतकरांना मिळाले मुबलक पाणी

By admin | Updated: May 17, 2016 04:06 IST

पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला.

कर्जत : यंदा लातूरमध्ये भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला. काही वर्षांपूर्वी कर्जतकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पंधरा वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने कर्जतमध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम राबविला आणि त्यावेळी कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेचा पाठपुरावा करून दहा वर्षांपूर्वी कर्जतकरांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळवून दिले. त्यावेळी हा उपक्रम राबविला नसता तर कर्जतकरांवरही लातूरसारखी परिस्थिती ओढवली असती. कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म पुन्हा राबवावा, अशी मागणी होत आहे.१९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कर्जतची पेज नदीवरील पाणी योजना शंभर टक्के अनुदानाने मंजूर केली. त्यासाठी १४ कोटी १३ लाख रु पये निधी मंजूर करून योजनेचे काम सुरु करण्यात आले. यासाठी तत्कालीन मंत्री रवींद्र माने, आमदार देवेंद्र साटम, नगराध्यक्ष धनंजय चाचड, नगरसेवक प्रवीण गांगल आणि त्यांच्या टीमने प्रयत्न केले होते. योजनेचे सात टक्के काम झाले असताना १९९९ मध्ये सरकार बदलले आणि त्या आघाडी सरकारच्या धोरणा मुळे पाणी योजना ठप्प झाली. दीड दोन वर्षे झाली तरी योजनेचे काम पुढे जात नव्हते. २१ सप्टेंबर २००१ रोजी ‘लोकमत आपल्या दारी’ हा उपक्र म कर्जतमध्ये आयोजित करण्याचे ठरले. कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेला न्याय मिळवून देण्याचा संकल्प त्यावेळी करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. सध्या कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. त्यातील अडथळे दूर करून तो मार्गी लागल्यास कर्जतकरिता दुसरी पाणी योजना तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आंदोलने सुद्धा झाली परंतु काहीही उपयोग नाही. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म आणावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)