शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्राचा अभाव!

By admin | Updated: June 21, 2016 23:41 IST

कृषी हवामानशास्त्रावर एकाच कृषी विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रम.

राजरत्न सिरसाट/अकोलाशेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामात पेरणीसाठी अचूक माहिती देण्यासाठी कृषी हवामानशास्त्राचा मोठा हातभार लागतो; परंतु राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्रच उपलब्ध नसून, या विषयावरील संशोधनासाठी एकाच कृषी विद्यापीठात कृषी हवामानशास्त्रावर आचार्य पदवी असल्याने या विषयातील तज्ज्ञच तयार होत नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान, अकोल्यात या विषयावर एम.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.हवामान बदलाचा शेतीवर आणि शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या राज्याचा अभ्यास आपल्याकडे असावा, याकरिता प्रथम केरळ व पंजाब कृषी विद्यापीठाने आघाडी घेतली. विशेष म्हणजे, या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या अगोदर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला; परंतु हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.राज्यातील शेतीसमोर हवामानबदलाचे मोठे आव्हान आहे. या बदलांमुळे पावसाचे सरासरी प्रमाण घसरले आहे. कमी दिवसांत जास्त पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस होतो. तापमानात बदल होत आहे. या सर्वांचा परिणाम पिके व उत्पादनावर होत आहे. त्यामुळे कृषिशास्त्रज्ञांपुढे नियोजन करताना मोठय़ा अडचणी निर्माण होत आहेत. यासाठीच स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्र असावे, ही मागणी कृषी विद्यापीठांनी लावून धरली आहे.- कृषी हवामानावर पीएच.डी. प्रगत महाराष्ट्रात एकाही कृषी विद्यापीठाकडे स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्र नाही आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोडले, तर इतर तीन विद्यापीठांमध्ये या विषयावर पीएच.डी. करता येत नाही आणि तेथेही पीएच.डी.ला दोन ते तीन विद्यार्थ्यांचीच प्रवेशक्षमता आहे.