शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सरकारी बँकांची मंत्र्यांवर ‘कृपा’!, बँकांना ५३.२५ कोटी रुपयांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 04:50 IST

कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यावर असलेल्या ७८.७५ कोटी रुपयांच्या कर्जाचे २५.५० कोटी रुपयांत ‘सेटलमेन्ट’ करण्यात आले

मुंबई : कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यावर असलेल्या ७८.७५ कोटी रुपयांच्या कर्जाचे २५.५० कोटी रुपयांत ‘सेटलमेन्ट’ करण्यात आले असून या कर्जाचे पुनर्गठन करताना बँकाना ५३.२५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीने मद्यार्क तयार करण्यासाठी महाराष्टÑ बँक व युनियन बँकेकडून प्रत्येकी २० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. संभाजी पाटील निलंगेकर हे या कर्जाचे जामीनदार आहेत. कंपनीने दोन वर्षे कर्जाचा नियमित भरणा केला. पण २०११ पासून मुद्दल व व्याज दोन्हीचे पैसे थकित होते. ३० जुलै २०११ ला ही दोन्ही कर्जे एनपीए झाली. त्यापोटी कंपनीने एकूण ७८.७५ कोटी रुपये (मुद्दल व व्याज पकडून) भरणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही बँकांनी कृपा दाखवत अवघ्या २५.५० कोटी रुपयांत प्रकरण ‘सेटल’ केले.प्राप्त माहितीनुसार, महाराष्टÑ बँकेचे व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीकडून एकूण २०.०९ कोटी रुपये मुद्दल व त्यावरील व्याज २१.७५ कोटी, असे एकूण ४१.८४ कोटी रुपये येणे होते. पण बँकेने हे खाते ‘सेटल’ करताना पूर्ण व्याज व मुद्दलाच्या काही रक्कमेचीही माफी दिली.  यामुळे कंपनीला आता फक्त १२.७५ कोटी रुपयांचीच परतफेड करायची आहे. याचप्रमाणे युनियन बँकेचे मुद्दल २०.५१ कोटी व त्यावरील १६.४० कोटी रुपये व्याज पकडून ३६.९१ कोटी रुपयांचा भरणा कंपनीने करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र बँकेने हे प्रकरण फक्त १२.७५ कोटी रुपयांत ‘सेटल’ केले.अन्य प्रकरण सीबीआयकडेसंभाजी पाटील निलंगेकर यांनी आजोबांची जमीन त्यांना माहिती न देता बँकेकडे गहाण ठेवली होती. ते प्रकरण उघड झाल्यावर बँकेने सीबीआयकडे तक्रार केली होती. सीबीआयने संभाजी पाटील व कंपनीची चौकशी करुन ३०२७ पानांचे आरोपपत्र लातूरच्या न्यायालयात दाखल केले. त्यावर अद्याप सुनावणी बाकी आहे.सारे काही नियमानुसारच‘कर्जाचे पुनर्गठन नियमानुसारच झाले आहे. व्यावसायिक कर्जात अशाप्रकारे बँका पुनर्गठन करतात. ही सर्व प्रक्रिया रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या अधीन राहून करण्यात आली आहे. यामध्ये मी केवळ जामीनदार आहे. या कंपनीशी किंवा कर्जाशी थेट संबंध नाही.- संभाजीराव पाटील, कामगार मंत्री