शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

तोट्याचे रडगाणे गाता येणार नाही

By admin | Updated: October 2, 2016 01:34 IST

सुरुवातीचे आठ वर्षे नुकसान सोसून त्यानंतर नफा कमवण्याची योजना आखूनच मेट्रो सुरू करण्यात आली. तशी अटच करारात नमूद केली आहे. त्यामुळे तोट्याचे रडगाणे गात

मुंबई : सुरुवातीचे आठ वर्षे नुकसान सोसून त्यानंतर नफा कमवण्याची योजना आखूनच मेट्रो सुरू करण्यात आली. तशी अटच करारात नमूद केली आहे. त्यामुळे तोट्याचे रडगाणे गात एमएओपीएल (मुंबई मेट्रो वन प्रा. लि.) भाडेवाढीसाठी केलेला अर्ज चुकीचा असल्याचा दावा शनिवारी एमएमएआरडीएने उच्च न्यायालयात केला.मेट्रो कायद्यांतर्गत दर निश्चित समितीने (एफएफसी) केलेली भाडेवाढ लागू करण्याची परवानगी घेण्यासाठी एमएमओपीएलने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे एफएफसीच्या बेसुमार भाडेवाढीला एमएमआरडीएने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील अंतिम सुनावणीला शनिवारपासून सुरुवात झाली. मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवरील सुनावणी होती.मेट्रो तोट्यात असून, आॅपरेटिंगचा खर्चही निघत नाही. तसेच एफएफसीने भाडे निश्चिती केल्याने एमएमआरडी करारानुसार भाडे आकारण्याची सक्ती करू शकत नाही, असे एमएमओपीएलने याचिकेत म्हटले आहे. मात्र एमएमओपीएलच्या या मुद्द्यांवर एमएमआरडीएने आक्षेप घेतला. ‘एफएफसीने दर निश्चित करताना करारातील अट लक्षात घेतली नाही. साध्या बेस्ट बसेसच्या केवळ दीडपट जास्त भाडे आकारण्याची अट करारात घालण्यात आली आहे. मेट्रो कायद्यामुळे करार रद्दबातल होत नाही. हे एमएमओपीएलने लक्षात घ्यायला हवे होते. मेट्रो नफा कमावण्यासाठी नसून सार्वजनिक वाहतुकीवर पर्यायाने रस्त्यांवर आलेला भार कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. भाडे वाढवून नफा कमवण्याऐवजी प्रवासी वाढवून नफा कमवण्याचा उद्देश मेट्रोचा आहे. मेट्रोने २०१२नंतर प्रवासी १० रुपयांवरून १४ रुपये वाढवले. याचा थेट परिणाम प्रवासी संख्येवर झाला. दरवर्षी एक लाख प्रवासी कमी होत आहेत. केवळ एसीमधून प्रवास करणाऱ्या ‘हायक्लास’साठी मेट्रो नाही. दीड लाख लोकांसाठी सर्वसामान्य नागरिकांनी त्याग केलेला नाही. मेट्रो उभारण्यासाठी काही वर्षे लागली. ज्या ठिकाणाहून मार्ग काढण्यात आले तेथील सामान्य नागरिकांनी त्रास सहन केला. एमएओपीएल व रिलायन्स ही गोष्ट विसरत आहे,’ असे अ‍ॅड. चिनॉय यांनी सांगितले. ‘उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ३ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी) अटी मान्य कराव्या लागतील...मेट्रो तोट्यात राहील म्हणून सरकारने कंपनीला डी.एन. नगर स्टेशनजवळील यार्डाची २७ एकर जागा दिली तसेच अन्य सुविधा दिल्या. मेट्रोसाठी भूखंड संपादित करावे लागले, त्यासाठी सरकारने संबंधितांना नुकसानभरपाई दिली. त्यामुळे एमएमओपीएला करारातील अटी मान्य कराव्या लागतील, असे अ‍ॅड. चिनॉय यांनी म्हटले.