शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ठाण्यात सरकारी दुधाचा तुटवडा

By admin | Updated: June 8, 2017 03:51 IST

शेतकऱ्यांच्या संपामुळे १ जूनपासून ठाण्यात सुरू असलेला दुधाचा तुटवडा कायम आहे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शेतकऱ्यांच्या संपामुळे १ जूनपासून ठाण्यात सुरू असलेला दुधाचा तुटवडा कायम आहे. बुधवारी ठाण्यात चक्क सरकारी दुधाचाच (महानंद) तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवल्याने विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. संपूर्ण शहरात ४० टक्के दुधाचा तुटवडा असल्याने संध्याकाळी दूधखरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. १ जून रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्यानंतर राज्यातील काही भागांत दूधविक्रेत्यांनीही या संपात सहभाग घेतला. या संपाच्या भीतीपोटी ठाण्यातील ग्राहकांनी दुपटीतिपटीने दूधखरेदी केले आणि त्या दिवशी संपूर्ण शहरात ३० ते ४० टक्के दुधाचा तुटवडा जाणवला. या दिवशी अचानक मागणी वाढल्याने दुधाची कमतरता जाणवली होती. दुसऱ्या दिवसापासून ग्राहकांची मागणी वाढली नसली, तरी आवक कमी झाली आणि आजपर्यंत हा तुटवडा शहरात जाणवत आहे. ठाण्यात मंगळवारी महानंदचे ५० टक्के, तर बुधवारी ८० टक्के दूध कमी आले. तसेच वारणा, गोकूळ यांच्याकडून नियमित दूध आले. अमुल २० टक्के, तर गोदावरीचे ३० टक्के दूध कमी आले. महानंद ही राज्य सरकारची डेअरी असतानाही त्यांच्याकडून दूध कमी येते. इतर कंपन्यांकडून मात्र नियमित दूध येत आहे. नेमके काय चालले आहे, असा सवाल ठाण्यातील दूधविक्रेत्यांनी केला आहे. काही ग्राहक सकाळी तर काही ग्राहक संध्याकाळी दूध खरेदी करतात. सध्या शेतकरी संपामुळे दूध मिळणार नाही, अशी भीती ठाणेकरांना वाटत असल्याने दुधाची साठवणूक करण्याकडे ठाणेकरांचा कल वाढला आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शहरात दुधाचा खूपच तुटवडा जाणवल्याने वारणाकडून अधिक दूध घेतल्याचे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी सांगितले. बुधवारी सकाळी दुधाचा तुटवडा जाणवला नाही, मात्र संध्याकाळी ग्राहकांना टंचाई भेडसावली, असेही ते म्हणाले.