शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

‘सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव!’

By admin | Updated: March 9, 2016 05:56 IST

राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने बरेचदा चांगल्या निर्णयांबाबतही गैरसमज निर्माण होतात, असा टोला हाणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने बरेचदा चांगल्या निर्णयांबाबतही गैरसमज निर्माण होतात, असा टोला हाणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समन्वयाची बैठक नियमित घेण्याचा सल्ला मंगळवारी दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांच्या आमदारांची बैठक झाली, त्यावेळी ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री राज्याच्या हिताचे निर्णय घेत असल्याने आम्ही त्यांच्यासोबत आहोत, पण घटकपक्षांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न नियमितपणे झाला पाहिजे, असे ठाकरे म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीसह राज्य सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती दिली. आपली सर्वांची मिळून शक्ती मोठी आहे. ती उद्यापासूनच्या अधिवेशनातूनही दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युतीचे सरकार २५ वर्षही कोणी घालवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी, विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देण्याची धमक आपल्यात आहे, असा विश्वास आमदारांना दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचे निर्णय घेत असाल तर सरकारसोबत राहू, असा इशारा दिला. (विशेष प्रतिनिधी)