शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

कामगार कल्याण कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेला मंजुरी

By admin | Updated: April 8, 2017 03:24 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांना गट विमा योजना लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली

मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांना गट विमा योजना लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मंडळातील पूर्णवेळ कर्मचारी आणि किमान तीन वर्षे सेवा झालेल्या अर्धवेळ कर्मचाऱ्यांना विमाछत्र मिळणार आहे.मंडळातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेत मंजुरी दिली आहे. या प्रस्तावासाठी मंडळाचे प्रभारी कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.या योजनेमुळे कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील पती किंवा पत्नी, २५ वर्षांपर्यंतची दोन मुले, आई आणि वडिलांना किंवा सासू आणि सासरे (महिला कर्मचाऱ्यांसाठी) यांना आता सर्व आजारांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. यात ३ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती आणि ५ लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. गंभीर, विद्यमान तसेच जन्मजात आजारांचादेखील या योजनेत समावेश आहे. सामान्य प्रसूतीसाठी ३० हजार रुपये, तर सिझेरियनसाठी ४० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या जन्मजात शिशूलादेखील या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यास कोणताही प्रतीक्षा काळ नसल्याने योजना लागू झाल्यापासून कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चासाठी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त मदतीची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी १५ लाख रुपयांचा कॉर्पोरेट बफर ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>महिन्याभरात लागू होणार योजनान्यू इंडिया एश्योरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविली जाणार असून, सुमारे महिन्याभरात योजना सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रती कर्मचारी ४ हजार ७१० रुपये इतका वार्षिक प्रीमियम अपेक्षित आहे. तरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय अर्थसाहाय्य योजनेची रक्कम आता गट विमा योजनेसाठी वळती केली जाईल, अशी माहिती मंडळाने दिली.