शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कामगार कल्याण कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेला मंजुरी

By admin | Updated: April 8, 2017 03:24 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांना गट विमा योजना लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली

मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांना गट विमा योजना लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मंडळातील पूर्णवेळ कर्मचारी आणि किमान तीन वर्षे सेवा झालेल्या अर्धवेळ कर्मचाऱ्यांना विमाछत्र मिळणार आहे.मंडळातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेत मंजुरी दिली आहे. या प्रस्तावासाठी मंडळाचे प्रभारी कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.या योजनेमुळे कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील पती किंवा पत्नी, २५ वर्षांपर्यंतची दोन मुले, आई आणि वडिलांना किंवा सासू आणि सासरे (महिला कर्मचाऱ्यांसाठी) यांना आता सर्व आजारांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. यात ३ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती आणि ५ लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. गंभीर, विद्यमान तसेच जन्मजात आजारांचादेखील या योजनेत समावेश आहे. सामान्य प्रसूतीसाठी ३० हजार रुपये, तर सिझेरियनसाठी ४० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या जन्मजात शिशूलादेखील या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यास कोणताही प्रतीक्षा काळ नसल्याने योजना लागू झाल्यापासून कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चासाठी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त मदतीची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी १५ लाख रुपयांचा कॉर्पोरेट बफर ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>महिन्याभरात लागू होणार योजनान्यू इंडिया एश्योरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविली जाणार असून, सुमारे महिन्याभरात योजना सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रती कर्मचारी ४ हजार ७१० रुपये इतका वार्षिक प्रीमियम अपेक्षित आहे. तरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय अर्थसाहाय्य योजनेची रक्कम आता गट विमा योजनेसाठी वळती केली जाईल, अशी माहिती मंडळाने दिली.