शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मजुरांचे स्थलांतर सुरू

By admin | Updated: September 9, 2015 00:55 IST

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे रोजगाराच्या शोधात मोठ्या संख्येने स्थलांतर सुरू असून, मागील महिनाभरात मराठवाड्यातून सुमारे चार लाखांपेक्षा अधिक मजूर प्रामुख्याने

औरंगाबाद : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे रोजगाराच्या शोधात मोठ्या संख्येने स्थलांतर सुरू असून, मागील महिनाभरात मराठवाड्यातून सुमारे चार लाखांपेक्षा अधिक मजूर प्रामुख्याने मुंबई अािण पुण्याकडे रवाना झाले आहेत. येत्या महिनाभरात स्थलांतरितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातून सर्वाधिक मजुरांचे स्थलांतर होत आहे. कारण दोन लाख पन्नास हजार मजुरांनी जॉब कार्ड घेतले असले तरी यापैकी केवळ ८० हजार मजुरांना काम मिळाले आहे. शिवाय यंदा मराठवाड्यातील साखर कारखाने सुरू होतील की नाही, अशी परिस्थिती असल्याने ५० हजार ऊसतोडणी मजुरांनी स्थलांतर केले आहे.जालना जिल्ह्यातील मंठा, बदनापूर, जालना, अंबड, परतूर या तालुक्यांमधून किमान १० हजार लोकांनी मुंबई आणि पुणे तसेच औरंगाबाद येथे स्थलांतर केले आहे. काही मजूर रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये गेले आहेत. परभणी जिल्ह्यातही यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे बिकट परिस्थिती आहे. ग्रामीण मजुरांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार आतापर्यंत कामाच्या शोधात २० टक्के मजुरांचे स्थलांतर झाले आहे़ जिल्ह्यातून नाशिक येथे सर्वाधिक मजूर स्थलांतरित होतात़ लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामांवर बंदी घातली आहे़ त्यामुळे २३ हजार बांधकाम मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे़ लातूर एमआयडीसीत दररोज एक तास या हिशेबाने उद्योजकांना आठवड्यातून एकदा पाणी देण्यात येत आहे़त्यामुळे दोन मोठे उद्योग गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत़ डाळ मिल आणि टेक्सटाइल या दोन उद्योगांचा यात समावेश आहे़ डाळ मिलमध्ये ३०० च्या आसपास आणि टेक्सटाइलमध्ये ३५० कामगार आहेत़ नांदेडमधील मजूर तेलंगण राज्यात स्थलांतरित होत आहेत़ जिल्ह्यात वेगवेगळ्या ५२८ कामांवर ४,३९५ मजूर काम करीत आहेत़ प्रशासन म्हणते की काम आहे पण मागणी नाही़ त्याचवेळी मजूर मात्र वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी करीत स्थलांतर करीत आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)