शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मजुरांचे स्थलांतर सुरू

By admin | Updated: September 9, 2015 00:55 IST

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे रोजगाराच्या शोधात मोठ्या संख्येने स्थलांतर सुरू असून, मागील महिनाभरात मराठवाड्यातून सुमारे चार लाखांपेक्षा अधिक मजूर प्रामुख्याने

औरंगाबाद : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे रोजगाराच्या शोधात मोठ्या संख्येने स्थलांतर सुरू असून, मागील महिनाभरात मराठवाड्यातून सुमारे चार लाखांपेक्षा अधिक मजूर प्रामुख्याने मुंबई अािण पुण्याकडे रवाना झाले आहेत. येत्या महिनाभरात स्थलांतरितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातून सर्वाधिक मजुरांचे स्थलांतर होत आहे. कारण दोन लाख पन्नास हजार मजुरांनी जॉब कार्ड घेतले असले तरी यापैकी केवळ ८० हजार मजुरांना काम मिळाले आहे. शिवाय यंदा मराठवाड्यातील साखर कारखाने सुरू होतील की नाही, अशी परिस्थिती असल्याने ५० हजार ऊसतोडणी मजुरांनी स्थलांतर केले आहे.जालना जिल्ह्यातील मंठा, बदनापूर, जालना, अंबड, परतूर या तालुक्यांमधून किमान १० हजार लोकांनी मुंबई आणि पुणे तसेच औरंगाबाद येथे स्थलांतर केले आहे. काही मजूर रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये गेले आहेत. परभणी जिल्ह्यातही यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे बिकट परिस्थिती आहे. ग्रामीण मजुरांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार आतापर्यंत कामाच्या शोधात २० टक्के मजुरांचे स्थलांतर झाले आहे़ जिल्ह्यातून नाशिक येथे सर्वाधिक मजूर स्थलांतरित होतात़ लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामांवर बंदी घातली आहे़ त्यामुळे २३ हजार बांधकाम मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे़ लातूर एमआयडीसीत दररोज एक तास या हिशेबाने उद्योजकांना आठवड्यातून एकदा पाणी देण्यात येत आहे़त्यामुळे दोन मोठे उद्योग गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत़ डाळ मिल आणि टेक्सटाइल या दोन उद्योगांचा यात समावेश आहे़ डाळ मिलमध्ये ३०० च्या आसपास आणि टेक्सटाइलमध्ये ३५० कामगार आहेत़ नांदेडमधील मजूर तेलंगण राज्यात स्थलांतरित होत आहेत़ जिल्ह्यात वेगवेगळ्या ५२८ कामांवर ४,३९५ मजूर काम करीत आहेत़ प्रशासन म्हणते की काम आहे पण मागणी नाही़ त्याचवेळी मजूर मात्र वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी करीत स्थलांतर करीत आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)