शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

१२ ऑगस्टपासून नृसिंहवाडीत सुरू होणार कन्यागत महापर्व

By admin | Updated: August 11, 2016 16:37 IST

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दि. शुक्रवार (१२ ऑगस्ट) कन्यागत महापर्वकाळ सुरु होत आहे. या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर दि. ११ : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दि. शुक्रवार (१२ ऑगस्ट)  कन्यागत महापर्वकाळ सुरु होत आहे. या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सारे नियोजन अतिशय चांगले झाले आहे. अशीच सज्जता व सक्षमत: संपुर्ण महापर्वाच्या 13 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक पर्वणीच्यावेळी ठेवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भक्त निवासात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार उल्हास पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, प्रांताधिकारी अश्विनी जिंरगे, एनडीआरएफचे वाय. ओ. नारंग, तहसिलदार सचिन गिरी, सरपंच अरुंधती जगदाळे, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नृसिंहवाडी, शिरोळ, गणेशवाडी, औरवाड, खिद्रापूर या ठिकाणी कन्यागत महासोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम होणार असून, पर्वणी काळासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा अतिशय चांगल्या पध्दतीने तयार असल्याचे प्रतिपादन करुन डॉ. अमित सैनी यांनी वारणा, पंचगंगा, कोयना या धारणांमधून विसर्ग होणाऱ्या पाण्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले. अलमट्टीच्या पाण्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही, असेही डॉ. सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले. पर्वणीच्या दिवशी दोन, तीन फुटाने पाणी कमी झाले तरी, घाटांच्या ठिकाणी स्नानाची संधी उपलब्ध करुन देता यईल, असे सांगून त्यांनी चेंजिंग रुप दर्जेदार असावे, यासाठी नियोजन करावे अशा सूचना दिल्या. पाणी कमी झाल्यानंतर शुक्लतीर्थ आणि पापविनाशीतीर्थ येथे भाविकांच्या स्नानाची व्यवस्था होऊ शकते. घाट तातडीने स्वच्छ करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 
आमदार उल्हास पाटील यांनी कन्यागत महापर्वकाळ 13 महिने चालू राहणार असून हा सर्व सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल व दर्जेदार उत्सव संपन्न होईल. येणार सर्व लोक आपले पाहुणे आहेत या भुमिकेतून प्रशासकी यंत्रणेबरोबरच स्थानिकांनीही आपली अतिथ्यशीलतेची परंपरा जपावी एकमेकांच्या हात हात घालून हा उत्सव व्यवस्थीतपणे पार पाडू. पाणी कमी किंवा जास्त झाले तरी कन्यागत महापर्वकाळ अतिशय चांगला पार पडेल असा विश्वास व्यक्त केला. 
एन.डी.आर.एफ.चे वाय.ओ. नारंग यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अतिशय नियोजनबध्द असल्याचे सांगून आपत्तीच्या काळात मदतीसाठी एनडीआरएफच्या 20 तज्ञ जवानांचे पथक तीन बोटींसह सज्ज असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच अरुंधती जगदाळे, शशिकांत पुजारी यांनी प्रशासनाच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि आमदार उल्हास पाटील यांनी गणेशवाडी, शुक्लतीर्थ, औरवाड, नृसिंहवाडी येथील मंदिराचे मुख्य घाट, पार्किंग व्यवस्था, विद्युत व्यवस्था, निवारा शेड आदीसर्व ठिकाणांची पाहणी केली. शुक्लतीर्थाच्या ठिकाणी दोन अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असे सांगितले. गणेशवाडी येथे घाटांवर पाणी कमी असल्याने स्नानाची व्यवस्था या ठिकाणी अतिशय चांगली होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होईल यासाठी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र युनिट ठेवावे, दोन बोटी ठेवाव्यात, वैद्यकीय पथक ठेवावे, अग्नीशमन यंत्रणा ठेवावी अशा सूचना दिल्या. पर्वणी काळात गणेशवाडी, खिद्रापूर, शिरोळ, औरवाड आणि नृसिंहवाडी याठिकाणी ठेवण्यात आलेल्या यंत्रणांचा एकमेकांमध्ये समन्वय असला पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.