शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

१२ ऑगस्टपासून नृसिंहवाडीत सुरू होणार कन्यागत महापर्व

By admin | Updated: August 11, 2016 16:37 IST

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दि. शुक्रवार (१२ ऑगस्ट) कन्यागत महापर्वकाळ सुरु होत आहे. या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर दि. ११ : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दि. शुक्रवार (१२ ऑगस्ट)  कन्यागत महापर्वकाळ सुरु होत आहे. या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सारे नियोजन अतिशय चांगले झाले आहे. अशीच सज्जता व सक्षमत: संपुर्ण महापर्वाच्या 13 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक पर्वणीच्यावेळी ठेवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भक्त निवासात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार उल्हास पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, प्रांताधिकारी अश्विनी जिंरगे, एनडीआरएफचे वाय. ओ. नारंग, तहसिलदार सचिन गिरी, सरपंच अरुंधती जगदाळे, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नृसिंहवाडी, शिरोळ, गणेशवाडी, औरवाड, खिद्रापूर या ठिकाणी कन्यागत महासोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम होणार असून, पर्वणी काळासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा अतिशय चांगल्या पध्दतीने तयार असल्याचे प्रतिपादन करुन डॉ. अमित सैनी यांनी वारणा, पंचगंगा, कोयना या धारणांमधून विसर्ग होणाऱ्या पाण्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले. अलमट्टीच्या पाण्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही, असेही डॉ. सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले. पर्वणीच्या दिवशी दोन, तीन फुटाने पाणी कमी झाले तरी, घाटांच्या ठिकाणी स्नानाची संधी उपलब्ध करुन देता यईल, असे सांगून त्यांनी चेंजिंग रुप दर्जेदार असावे, यासाठी नियोजन करावे अशा सूचना दिल्या. पाणी कमी झाल्यानंतर शुक्लतीर्थ आणि पापविनाशीतीर्थ येथे भाविकांच्या स्नानाची व्यवस्था होऊ शकते. घाट तातडीने स्वच्छ करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 
आमदार उल्हास पाटील यांनी कन्यागत महापर्वकाळ 13 महिने चालू राहणार असून हा सर्व सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल व दर्जेदार उत्सव संपन्न होईल. येणार सर्व लोक आपले पाहुणे आहेत या भुमिकेतून प्रशासकी यंत्रणेबरोबरच स्थानिकांनीही आपली अतिथ्यशीलतेची परंपरा जपावी एकमेकांच्या हात हात घालून हा उत्सव व्यवस्थीतपणे पार पाडू. पाणी कमी किंवा जास्त झाले तरी कन्यागत महापर्वकाळ अतिशय चांगला पार पडेल असा विश्वास व्यक्त केला. 
एन.डी.आर.एफ.चे वाय.ओ. नारंग यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अतिशय नियोजनबध्द असल्याचे सांगून आपत्तीच्या काळात मदतीसाठी एनडीआरएफच्या 20 तज्ञ जवानांचे पथक तीन बोटींसह सज्ज असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच अरुंधती जगदाळे, शशिकांत पुजारी यांनी प्रशासनाच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि आमदार उल्हास पाटील यांनी गणेशवाडी, शुक्लतीर्थ, औरवाड, नृसिंहवाडी येथील मंदिराचे मुख्य घाट, पार्किंग व्यवस्था, विद्युत व्यवस्था, निवारा शेड आदीसर्व ठिकाणांची पाहणी केली. शुक्लतीर्थाच्या ठिकाणी दोन अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असे सांगितले. गणेशवाडी येथे घाटांवर पाणी कमी असल्याने स्नानाची व्यवस्था या ठिकाणी अतिशय चांगली होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होईल यासाठी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र युनिट ठेवावे, दोन बोटी ठेवाव्यात, वैद्यकीय पथक ठेवावे, अग्नीशमन यंत्रणा ठेवावी अशा सूचना दिल्या. पर्वणी काळात गणेशवाडी, खिद्रापूर, शिरोळ, औरवाड आणि नृसिंहवाडी याठिकाणी ठेवण्यात आलेल्या यंत्रणांचा एकमेकांमध्ये समन्वय असला पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.