शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

१२ ऑगस्टपासून नृसिंहवाडीत सुरू होणार कन्यागत महापर्व

By admin | Updated: August 11, 2016 16:37 IST

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दि. शुक्रवार (१२ ऑगस्ट) कन्यागत महापर्वकाळ सुरु होत आहे. या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर दि. ११ : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दि. शुक्रवार (१२ ऑगस्ट)  कन्यागत महापर्वकाळ सुरु होत आहे. या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सारे नियोजन अतिशय चांगले झाले आहे. अशीच सज्जता व सक्षमत: संपुर्ण महापर्वाच्या 13 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक पर्वणीच्यावेळी ठेवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भक्त निवासात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार उल्हास पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, प्रांताधिकारी अश्विनी जिंरगे, एनडीआरएफचे वाय. ओ. नारंग, तहसिलदार सचिन गिरी, सरपंच अरुंधती जगदाळे, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नृसिंहवाडी, शिरोळ, गणेशवाडी, औरवाड, खिद्रापूर या ठिकाणी कन्यागत महासोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम होणार असून, पर्वणी काळासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा अतिशय चांगल्या पध्दतीने तयार असल्याचे प्रतिपादन करुन डॉ. अमित सैनी यांनी वारणा, पंचगंगा, कोयना या धारणांमधून विसर्ग होणाऱ्या पाण्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले. अलमट्टीच्या पाण्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही, असेही डॉ. सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले. पर्वणीच्या दिवशी दोन, तीन फुटाने पाणी कमी झाले तरी, घाटांच्या ठिकाणी स्नानाची संधी उपलब्ध करुन देता यईल, असे सांगून त्यांनी चेंजिंग रुप दर्जेदार असावे, यासाठी नियोजन करावे अशा सूचना दिल्या. पाणी कमी झाल्यानंतर शुक्लतीर्थ आणि पापविनाशीतीर्थ येथे भाविकांच्या स्नानाची व्यवस्था होऊ शकते. घाट तातडीने स्वच्छ करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 
आमदार उल्हास पाटील यांनी कन्यागत महापर्वकाळ 13 महिने चालू राहणार असून हा सर्व सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल व दर्जेदार उत्सव संपन्न होईल. येणार सर्व लोक आपले पाहुणे आहेत या भुमिकेतून प्रशासकी यंत्रणेबरोबरच स्थानिकांनीही आपली अतिथ्यशीलतेची परंपरा जपावी एकमेकांच्या हात हात घालून हा उत्सव व्यवस्थीतपणे पार पाडू. पाणी कमी किंवा जास्त झाले तरी कन्यागत महापर्वकाळ अतिशय चांगला पार पडेल असा विश्वास व्यक्त केला. 
एन.डी.आर.एफ.चे वाय.ओ. नारंग यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अतिशय नियोजनबध्द असल्याचे सांगून आपत्तीच्या काळात मदतीसाठी एनडीआरएफच्या 20 तज्ञ जवानांचे पथक तीन बोटींसह सज्ज असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच अरुंधती जगदाळे, शशिकांत पुजारी यांनी प्रशासनाच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि आमदार उल्हास पाटील यांनी गणेशवाडी, शुक्लतीर्थ, औरवाड, नृसिंहवाडी येथील मंदिराचे मुख्य घाट, पार्किंग व्यवस्था, विद्युत व्यवस्था, निवारा शेड आदीसर्व ठिकाणांची पाहणी केली. शुक्लतीर्थाच्या ठिकाणी दोन अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असे सांगितले. गणेशवाडी येथे घाटांवर पाणी कमी असल्याने स्नानाची व्यवस्था या ठिकाणी अतिशय चांगली होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होईल यासाठी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र युनिट ठेवावे, दोन बोटी ठेवाव्यात, वैद्यकीय पथक ठेवावे, अग्नीशमन यंत्रणा ठेवावी अशा सूचना दिल्या. पर्वणी काळात गणेशवाडी, खिद्रापूर, शिरोळ, औरवाड आणि नृसिंहवाडी याठिकाणी ठेवण्यात आलेल्या यंत्रणांचा एकमेकांमध्ये समन्वय असला पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.