शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

केव्हीकेच्या ११२ जागा भरणार !

By admin | Updated: September 14, 2016 00:35 IST

प्रभाव लोकमतचा; शास्त्रज्ञांच्या मुलाखतींना सोमवारपासून वेग

राजरत्न सिरसाटअकोला, दि. १३ : विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांसह इतर ११२ नियमित रिक्त जागा भरण्यात असून यासाठी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मुलाखती घेण्यात येत आहेत. या रिक्त जागांबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता हे विशेष.प्रत्येक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी अडचणीविषयक अचूक माहिती व शंका निरसनासाठी राज्यात कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) स्थापना करण्यात आली; परंतु विदर्भ याला अपवाद ठरत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या सात कृषी विज्ञान केंद्रांतील ८0 टक्के शास्त्रज्ञ, कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त असल्याने शेतकर्‍यांना अद्ययावत माहिती पुरविण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे वृत्त लोकमतने ८ मेच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेने लवकरच रिक्त जागा भरण्याचे आदेश निघणार असल्याची माहिती त्यावेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) शास्त्रज्ञ डॉ. राजेंदर जी. रेड्डी यांनी लोकमतला दिली होती. भारतीय कृषी संशोधन परिषदेने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सात कृषी विज्ञान केंद्रे आहेत. या प्रत्येक जिल्हय़ातील शेतकर्‍यांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीचे प्रयत्न केले जातात. या केंद्रांतर्गत प्रत्यक्ष शेतात जाणार्‍या कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. या सात कृषी विज्ञान केंद्रांतर्गत जवळपास ११२ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी प्रयत्न झाले; पण महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेंतर्गत जागा भरण्याचा प्रस्ताव प्रलंबित होते. त्यामुळे कृषी विद्यापीठाने त्यांच्या आस्थापनेवरील शास्त्रज्ञ, कर्मचार्‍यांना या जागांवर तात्पुरती नेमणूक केल्याने कृषी विद्यापीठाच्या नियमित कामावर त्याचे परिणाम झाले होते. या पृष्ठभूमीवर राज्य शासन व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने दखल घेत या जागा भरण्याचे पाऊल उचलले असून, सोमवारपासून कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन सहायक ांची पदे भरण्यासाठीच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.*प्रत्येक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी अडचणीविषयक अचूक माहिती व शंका निरसनासाठी राज्यात कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) स्थापना करण्यात आली आहे. रिक्त जागा भरण्यात येत असल्याने शेतकर्‍यांच्या शेतीविषयक अडचणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सध्या केव्हीकेची कामे बघत आहेत. त्यांच्यावरील कामाचा भार कमी होईल व कृषी विद्यापीठाचे मनुष्यबळ वाढेल.- डॉ.व्ही.एम. भाले,अधिष्ठाता (कृषी),डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.