शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

कुशाभाऊ बांगर शाळेची घंटा वाजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 01:53 IST

चांदिवली येथील संघर्षनगरमधील कुशाभाऊ बांगर शाळेवर होत असलेल्या तोडक कारवाईविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या चिमुकल्यांच्या संघर्षाला यश आले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार

मुंबई : चांदिवली येथील संघर्षनगरमधील कुशाभाऊ बांगर शाळेवर होत असलेल्या तोडक कारवाईविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या चिमुकल्यांच्या संघर्षाला यश आले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार शाळेचे वर्ग पर्यायी जागेत भरविणे सुरु झाले आहे. शुक्रवारपासून पर्यायी जागेत शाळेचे वर्ग भरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला असून, शाळेने समाधान व्यक्त केले आहे.बांगर या अनुदानित शाळेवर विकासकाच्या संगनमतामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात येत असताना विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पाचवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधातच आवाज उचलला आणि लढा दिला. तब्बल दोन वेळा शाळेवर कारवाई करण्यासाठी दाखल झालेल्या पालिकेला विद्यार्थ्यांसमोर माघार घ्यावी लागली. अखेर उच्च न्यायालयात यावर झालेल्या सुनावणीदरम्यान ३० एप्रिल २०१६ पर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण व्हावे यासाठी त्याच परिसरात पर्यायी सात वर्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने विकासकाला दिले. त्यानुसार विद्यार्थ्यांना पर्यायी जागी उपलब्ध करून देण्यात आली.पुढे काय? : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याचे समाधान आहे. मात्र मराठी शाळांचा मुद्दा ऐरणीवर आहे. शाळा शंभर टक्के अनुदानित असताना पालिकेकडून शाळेसाठी कायमस्वरुपी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पुढाकार घेतला जात नाही. त्यामुळे कालांतराने जागेअभावी शाळा बंद पडणार का? हा सवाल असून, याबाबत पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरु आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांनी दिली.