शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

मराठवाड्यात भाजपाची सेनेवर कुरघोडी

By admin | Updated: February 25, 2017 01:07 IST

जिल्हा परिषद निवडणुकीने मराठवाड्याच्या राजकारणाचा बाज बदलून टाकला असून, पुढच्या पाच-पंचवीस वर्षांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचे स्पष्ट संकेत दिले.

सुधीर महाजन, औरंगाबादजिल्हा परिषद निवडणुकीने मराठवाड्याच्या राजकारणाचा बाज बदलून टाकला असून, पुढच्या पाच-पंचवीस वर्षांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचे स्पष्ट संकेत दिले. लातुरात भाजप स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्ता राबविणार. येथील काँग्रेसची परंपरागत जहागीरच खालसा झाली. हे उदाहरण राजकारणाची दिशा देण्यासाठी पुरेसे आहे. परंपरागत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पिछाडीवर गेले; पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईनंतर उर्वरित महाराष्ट्रात पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेनेने मराठवाडा काबीज केला होता आणि मराठवाड्याच्या मातीत ती फोफावली, त्याचे कारण तिचा हिंदुत्वाचा बाज आणि पोलीस अ‍ॅक्शननंतर मराठवाड्याची बनलेली मानसिकता; पण या निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा विचार करता हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. एकीकडे मुस्लिम इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) हा पक्ष अस्तित्व दाखवत असताना शिवसेनेची पीछेहाट या पक्षाला विचार करायला लावणारी आहे.मराठवाड्यातील आठ जिल्हा परिषदांतील ४६० जागांचा विचार केला तर सर्वात जास्त १३२ जागा भाजपने पटकावल्या. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीने ११७ जागा जिंकून दुसरा क्रमांक गाठला. काँग्रेस ९८ जागांवर तिसऱ्या, तर शिवसेना ८७ जागा जिंकून चौथ्या स्थानावर फेकली गेली. यापूर्वीच्या निवडणुकीत हिंगोली जि.प. ची सत्ता शिवसेनेने स्वबळावर मिळवली होती. यावरून सेनेच्या या गडाची किती मोठ्या प्रमाणावर पडझड झाली हे दिसते. गड राखण्यासाठी त्याची वेळोवेळी दुरुस्ती करावी लागते, मजबुतीकरण करावे लागते. किल्लेदारांच्या बदल्या केल्या की नवे किल्लेदार जोमाने काम करतात; पण शिवसेनेने मराठवाड्याच्या गडाकडे फारसे लक्ष दिले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण अजून थांबत नाही. पराभवाच्या फटक्यांनी जागे होण्यापेक्षा हा पक्ष बधिर होत चालला असे चित्र आहे. तिसऱ्या स्थानावर पक्ष असला तरी तो राष्ट्रवादीसोबत तीन ठिकाणी सत्तेवर येऊ शकतो. या झंझावातात राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी ठीक राहिल्याचे दिसले. भाजपपाठोपाठ त्यांची ताकद दिसून आली. मराठवाड्यात औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण याचेही बुरूज ढासळले.