शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमध्ये सेनेचा स्वतंत्र आखाडा!

By admin | Updated: July 15, 2015 02:48 IST

सत्तेत राहून विरोधकाची भूमिका वठविणाऱ्या शिवसेनेने सिंहस्थ कुंभपर्वातही आपली वेगळी चूल मांडली आहे. साधुग्राममध्ये खासगी जागा घेऊन सेनेच्या एका माजी आमदाराने

नाशिक : सत्तेत राहून विरोधकाची भूमिका वठविणाऱ्या शिवसेनेने सिंहस्थ कुंभपर्वातही आपली वेगळी चूल मांडली आहे. साधुग्राममध्ये खासगी जागा घेऊन सेनेच्या एका माजी आमदाराने आपल्या धार्मिक गुरूचा स्वतंत्र आखाडा काढला आहे. विशेष म्हणजे सिंहस्थ कुंभपर्वाचे धर्मध्वजारोहण मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत असताना, दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आखाड्यातील अखंड धर्मज्योत प्रज्वलित करून इथेही आपला सवतासुभा मांडला! सिंहस्थ सोहळ्याची सर्व सूत्रे भाजपाच्या हाती आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन हे जातीने सर्व व्यवस्था पाहत आहेत. शिवाय, महापालिका मनसेच्या ताब्यात असल्याने पर्वाच्या नियोजनापासून ते विविध कार्यक्रमांच्या आयोजनापर्यंत मनसैनिक घरचे कार्य समजून उत्सवात हिरिरीने सहभागी होत आहेत. या सगळ्या उत्सवात शिवसेना बाजूला पडू नये म्हणून शिवसेनेचे माजी आमदार बबन घोलप यांनी आपलाही एक तंबू ठोकला आहे. धार्मिक गुरू हिमालयबाबा यांच्यासाठी तपोवनातील मोक्याची खासगी जागा अधिग्रहित करून त्यावर भव्य आखाडा उभा केला आहे. सिंंहस्थपर्वात या आखाड्यात होम-हवन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पर्वाच्या पहिल्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाचारण करून त्यांच्या हस्ते आखाड्यात धर्मज्योत प्रज्वलित करण्यात आली. या वेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणाही देण्यात आल्या! (प्रतिनिधी)सेनेचे मंत्री नाराज..शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेला आमदारांच्या बैठकीत मंगळवारी एकमुखी पाठिंबा देण्यात आला असला तरी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. मागील सरकारमधील कर्जमाफी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील बँकांच्या पथ्यावर पडणारी होती. त्यामुळे भाजपाची कोंडी करताना राष्ट्रवादीला फायदा होणारी भूमिका सेनेने घेऊ नये, असे सेनेच्या दोन मंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी खासगीत बोलताना सांगितले. सिंहस्थासाठी कायमस्वरूपी जागानाशिक : कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करून, जागा मालकांना त्याचा योग्य मोबदलाही देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.