शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ-मालवणमधून लढणार

By admin | Updated: September 15, 2014 02:27 IST

यावेळी राणे म्हणाले, १ सप्टेंबरला मुंबई येथील हुतात्मा चौक येथे काँग्रेसने अखंड महाराष्ट्र ठेवण्याची प्रतिज्ञा करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली

कणकवली : भाजप व शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून राजकीय स्वार्थापोटी वाद सुरू आहेत. विरोधकांकडे प्रचारासाठी कोणतेही मुद्दे नसून, गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे हाच आमचा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल, असे सांगतानाच पक्षाच्या आदेशाप्रमाणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे, असे काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे ंजाहीर केले.उद्योगमंत्री राणे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून, कणकवली येथे पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभेतील काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, १ सप्टेंबरला मुंबई येथील हुतात्मा चौक येथे काँग्रेसने अखंड महाराष्ट्र ठेवण्याची प्रतिज्ञा करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. १७ सप्टेंबरला या निवडणुकीसाठीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे. विरोधकांनी जनतेची केलेली फसवणूक, दिलेल्या आश्वासनांची न केलेली पूर्तता, वाढती महागाई, असे मुद्दे घेऊन आम्ही प्रचारात उतरणार आहोत. देशाची परिस्थिती विचारात न घेता केंद्र शासनाकडून नियोजन केले जात असल्यानेच ‘जन-धन’सारख्या योजना फसत आहेत. त्यामुळे हे मुद्देही प्रचारात उपस्थित केले जाणार आहेत. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे यांचाही समावेश प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये असेल. महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर असून, राज्य चालविण्याची क्षमता असलेल्या नेत्यांचा दुष्काळ भाजप तसेच शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच कौल देईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबतची सूत्रे दोन-चार दिवसांत निश्चित होतील, अशी अपेक्षाही राणे यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, सिंधुदुर्गसह कोकणात काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडून नीतेश राणे यांचे एकमेव नाव असून, उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. कासार्डे एमआयडीसी तेथील जनतेला नको असल्याने रद्द केली आहे. तेथील जनता ज्यावेळी एमआयडीसी आपल्याला हवी असे सांगेल, त्यावेळी पुन्हा त्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)