शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

कुडाळ-मालवणमधून लढणार

By admin | Updated: September 15, 2014 02:27 IST

यावेळी राणे म्हणाले, १ सप्टेंबरला मुंबई येथील हुतात्मा चौक येथे काँग्रेसने अखंड महाराष्ट्र ठेवण्याची प्रतिज्ञा करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली

कणकवली : भाजप व शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून राजकीय स्वार्थापोटी वाद सुरू आहेत. विरोधकांकडे प्रचारासाठी कोणतेही मुद्दे नसून, गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे हाच आमचा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल, असे सांगतानाच पक्षाच्या आदेशाप्रमाणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे, असे काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे ंजाहीर केले.उद्योगमंत्री राणे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून, कणकवली येथे पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभेतील काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, १ सप्टेंबरला मुंबई येथील हुतात्मा चौक येथे काँग्रेसने अखंड महाराष्ट्र ठेवण्याची प्रतिज्ञा करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. १७ सप्टेंबरला या निवडणुकीसाठीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे. विरोधकांनी जनतेची केलेली फसवणूक, दिलेल्या आश्वासनांची न केलेली पूर्तता, वाढती महागाई, असे मुद्दे घेऊन आम्ही प्रचारात उतरणार आहोत. देशाची परिस्थिती विचारात न घेता केंद्र शासनाकडून नियोजन केले जात असल्यानेच ‘जन-धन’सारख्या योजना फसत आहेत. त्यामुळे हे मुद्देही प्रचारात उपस्थित केले जाणार आहेत. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे यांचाही समावेश प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये असेल. महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर असून, राज्य चालविण्याची क्षमता असलेल्या नेत्यांचा दुष्काळ भाजप तसेच शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच कौल देईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबतची सूत्रे दोन-चार दिवसांत निश्चित होतील, अशी अपेक्षाही राणे यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, सिंधुदुर्गसह कोकणात काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडून नीतेश राणे यांचे एकमेव नाव असून, उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. कासार्डे एमआयडीसी तेथील जनतेला नको असल्याने रद्द केली आहे. तेथील जनता ज्यावेळी एमआयडीसी आपल्याला हवी असे सांगेल, त्यावेळी पुन्हा त्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)