शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेचे पाणी मुंबईला नेणार : वायकर

By admin | Updated: February 2, 2015 23:56 IST

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

पाटण : ‘इंग्रजांच्या काळात १७० किलोमीटरची जलवाहिनी टाकून मुंबईला पाणीपुरवठा केला होता. तर मग कोयना धरणातील पाणी मुंबईला का जाऊ शकत नाही? त्यासाठी भविष्यात पाठपुरावा करून कोयनेचे पाणी मुंबईला नेणार आहे,’ अशी माहिती गृहनिर्माण, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान राज्यमंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.दौलतनगर,मरळी, ता. पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वायकर म्हणाले, ‘कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती करून उरलेले पाणी नदीत सोडले जाते. हे पाणी वाया जात आहे. दुसरीकडे चिपळूणमधील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. अशा गावांना कोयनेच्या पाण्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्राध्यापकांची संख्या कमी पडत आहे. तासिका धर्तीवर अनेकजण कमी पगारात काम करत आहेत. राज्यातील औद्योगिक वसाहतीत अनेक यंत्रणा पडून आहेत. बाजारात कुशल कामगारांचा पुरेसा संख्याबळ असताना अशा यंत्रणा व गुंतवणुकीचा प्रत्यक्ष वापर झाला पाहिजे.’ ‘महिलांना पन्नास टक्के राखीव जागा असल्याच पाहिजेत, हे शिवसेनेचे धोरण आहे. प्राथमिक शिक्षण विभाग माझ्या ताब्यात नसला तरी वीस पटांखालील शाळा बंद करणे, शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे व प्राथमिक शिक्षण विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा करणार आहे.’ (प्रतिनिधी)