शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘कोपर्डी’चे राजकारण नको

By admin | Updated: September 2, 2016 01:33 IST

कोपर्डीची घटना वाईट आहे. गुन्हेगाराची जात असू शकत नाही. तो गुन्हेगारच असतो. आज जे मोर्चे निघतात तो आक्रोश आहे. याचा दुसरा अर्थ कोणी काढू नये. मराठा समाजाने मोर्चे

मुंबई : कोपर्डीची घटना वाईट आहे. गुन्हेगाराची जात असू शकत नाही. तो गुन्हेगारच असतो. आज जे मोर्चे निघतात तो आक्रोश आहे. याचा दुसरा अर्थ कोणी काढू नये. मराठा समाजाने मोर्चे काढत संयम पाळला. मात्र अशा प्रकरणाचे राजकारण होता कामा नये, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक महिलेच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मंत्रिपद मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.सत्काराला उत्तर देताना आठवले म्हणाले, की कोपर्डी प्रकरणात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडून दिले. ज्यांनी अत्याचार केले, खून केले ते लोक आमचे नाहीत. त्यांना फाशी झालीच पाहिजे. मराठा समाजाने मोर्चे काढले. आम्हीपण मोर्चे काढू. माझ्याकडे केंद्राचे सामाजिक न्याय खाते असले तरी कायदा हा कोणावर अन्याय करण्यासाठी नाही. त्यामुळे कायदा रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही. जातीय वादातून अत्याचार होत असले तरी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अबाधित राहणार. रामदास आठवले कोण आहे? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. ‘आठवले हा माणसाला जोडणारा फोन आहे. आठवले दलित चळवळीचा बोन आहे’, असं त्यांनी म्हणताच टाळ््यांचा कडकडाट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलतील, असे लोक म्हणतात. पण संविधान बदलण्यापेक्षा तुम्ही बदला, असेही ते म्हणाले. कोपर्डीच्या निमित्ताने वातावरण गढूळ करण्याचे काम कोणी करू नये. हे पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभणारे नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले. अविनाश महातेकर म्हणाले, की कोपर्डीचे राजकारण सुरु आहे. दंगली पेटवण्याचे राजकारण आम्ही होऊ देणार नाही. (प्रतिनिधी)