शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोकणवर ठाण्याचा वरचष्मा

By admin | Updated: January 21, 2017 04:30 IST

कोकण विभाग मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व अधिक सिद्ध होत आहे.

सुरेश लोखंडे,

ठाणे- कोकण विभाग मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व अधिक सिद्ध होत आहे. विद्यमान आमदार येथील असून सर्वाधिक मतदार आणि मातब्बर आणि कडवी झुंज देणारे उमेदवार जिल्ह्यात आहे. यामुळे सर्वांगीण विचार करता कोकण विभाग शिक्षक मतदारसंघावर ठाणे जिल्ह्याचा वरचश्मा राहणार आहे. विधान परिषदेवर या निवडणुकीद्वारे शिक्षकांनी एक आमदार निवडून द्यायचा आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षकांसह महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना मतदानाचा हक्क आहे. विद्यमान आमदार रामनाथ मोते यांचा कार्यकाळ ५ डिसेंबर रोजी संपलेला आहे. यामुळे त्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील ३७ हजार ६४४ शिक्षक, प्राध्यापक या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यातील सर्वाधिक १५ हजार ७६६ जिल्ह्यातील आहेत.यात पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी ५० टक्के मतदान अपेक्षित आहे. त्यासाठी तीन हजार ५६ मतदार ठाणे जिल्ह्यात कमी आहेत. परंतु, अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यात आहे. याशिवाय, सत्ताधारी भाजपाचा पाठिंबा असलेले शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू विद्यमान आमदार, पण अपक्ष उमेदवार रामनाथ मोते, सत्ताधारी शिवसेनेचा पाठिंबा असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी लढा असल्याचे सांगून निवडणूक रिंगणात असलेले लोकभारतीचे अशोक बेलसरे असे उमेदवार आहेत. या आधीच्या निवडणुकांमध्ये सक्रिय असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा या निवडणुकीतील बलाढ्य उमेदवार बाळाराम दत्तात्रेय पाटील रायगडचे आहेत. ते पुरोगामी शिक्षक आघाडीचे उमेदवार असून त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे नरसू पाटील (उरण) आदी या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.अंतिम रिंगणात १० उमेदवारकोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात १० उमेदवार शिल्लक राहिले आहेत. सुमारे २७ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, शुक्रवारी १७ जणांनी उमेदवारी मागे घेतली. यामध्ये तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. काही उमेदवारांनी दोनदोन दाखल केलेले उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतले.या मतदारसंघात शिक्षकसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि लोकभारतीचे अशोक बेलसरे यांना संघटनांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर, अपक्ष उमेदवारांमध्ये अशोक बहिरव, वेणुनाथ कडू, केदार जोशी, नरसू पाटील, बाळाराम पाटील, महादेव सुळे , मिलिंद कांबळे आणि रामनाथ मोते हे आठ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उस्मान रोहेकर यांचे प्रतिज्ञापत्र नसल्यामुळे तर दिलीप गव्हाळे यांनी प्रतिज्ञापत्र नोटरी न केल्याने तसेच तुळशीदास जाधव यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने या हे उमेदवार बाद झाले आहेत. या निवडणुकीतून माघार घेतलेल्यांमध्ये काशिनाथ म्हात्रे, राजाराम पाटील, अंबादास काळे यांचा समावेश आहे. > चुरस वाढलीमुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षक परिषदेच्या वेणूनाथ कडू यांना भारतीय जनता पार्टीसह रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) या राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासह आता अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांनीही समर्थन दिले आहे. त्यामुळे येथील निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.कोकण विभागातील खैर ए उम्मत ट्रस्ट संस्थेच्या विविध शाळा, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, लाडशाखीय वाणी समाज, ब्राह्मण सभा यांनी शिक्षक परिषदेला लेखी पाठिंबा दिला आहे. शिवाय कडू यांच्या प्रचारात उतरण्याचेही आश्वासन दिले आहे.