शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कोकण रेल्वेला दरवर्षी तीनशे कोटींचा तोटा

By admin | Updated: February 25, 2015 00:10 IST

१९९० मध्ये रोहा ते मंगलोर अशा ७६१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात आली; पण १९९८ ला कोकण रेल्वे पूर्णत: सुरू झाली, तेव्हा ७४१ किलोमीटरपर्यंतच धावू लागली.

अनंत जाधव - सावंतवाडी -रोहा ते मंगलोर या १९९० ला मंजुरी मिळालेल्या कोकण रेल्वेचा ७६१ किलोमीटरपैकी २० किलोमीटरचा ठोकूर ते मंगलोर हा भाग दक्षिण रेल्वेने बळकावल्याने कोकण रेल्वेला दरवर्षी ३०० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्रालयाला परिस्थितीजन्य पुरावे देत हा वीस किलोमीटरचा भाग पुन्हा कोकण रेल्वेला जोडला जावा, अशी मागणी केली आहे. मात्र, तिला रेल्वे मंत्रालयाने केराची टोपली दाखविली आहे. याप्रकरणी बंगलोर येथील उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे.कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या चार राज्यांतून धावते. १९९० मध्ये रोहा ते मंगलोर अशा ७६१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात आली; पण १९९८ ला कोकण रेल्वे पूर्णत: सुरू झाली, तेव्हा ७४१ किलोमीटरपर्यंतच धावू लागली. या रेल्वेचा ठोकूरपर्यंतचा भाग कोकण रेल्वेत घेण्यात आला, तर पुढील २० किलोमीटरचा भाग दक्षिण रेल्वेने काबीज केला. तत्कालीन रेल्वेचे अधिकारी (पान ८ वर)कोकणच्या रेल्वेमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात अपेक्षाठोकूर (कर्नाटक) ते मंगलोर बंदरपर्यंतचा भाग सद्य:स्थितीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळेच मिळू शकतो, अन्यथा हा मार्ग मिळणे कोकण रेल्वेसाठी कठीण आहे. याबाबत कोकण रेल्वेने तत्कालीन रेल्वेचे अधिकारी ई. श्रीधरन यांच्यासह रेल्वे मंत्रालयाशी झालेला करार रेल्वे मंत्रालयाच्या दरबारी ठेवला असून, हा मार्ग कोकण रेल्वेला मिळावा यासाठी कर्नाटक पॅसेंजर असोसिएशनने २०१३ मध्ये बंगलोर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. रेल्वे अर्थसंकल्पात प्रभू याबाबत काही घोषणा करणार का? याकडे कोकणवासीयांचे लक्ष आहे.आणि कोकण रेल्वे प्रत्यक्षात कृतीत आणणारे ई. श्रीधरन यांनीही १९९८ ला रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून ठोकूर ते मंगलोर बंदरपर्यंतचा दक्षिण रेल्वेला जोडलेला भाग पुन्हा कोकण रेल्वेला जोडला जावा, अशी मागणी केली होती; पण या मागणीला रेल्वे मंत्रालयाने केराची टोपली दाखवली.दक्षिण रेल्वेने मंगलोरपर्यंतचा वीस किलोमीटरचा भाग आपल्या ताब्यात घेतल्याने कोकण रेल्वेचे दरवर्षी साधारणत: तीनशे कोटींचे नुकसान होत आहे. कोकण रेल्वे स्वत:चे उत्पादन घेईल, अशी कोणतीही उपाययोजना नाही. कोकण रेल्वेच्या ताब्यात सद्य:स्थितीत कोणतेही बंदर नाही. एकमेव मंगलोर बंदरावर दक्षिण रेल्वेने अधिकार सांगितला आहे. याशिवाय डिझेल तसेच रेल्वेभाडे आदी बाबींवर कोकण रेल्वेचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. तसेच कोकण रेल्वे सुरू करण्यासाठी घेतलेले कर्ज अद्याप देणे बाकी आहे. यामुळे कोकण रेल्वे आर्थिक अडचणीत असतानाच कोकण रेल्वेला फायदा करून देणारे मंगलोर बंदर तरी आपणास मिळावे, यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. १६ वर्षांत पाच हजार कोटींचा तोटाकोकण रेल्वेला ठोकूरपर्यंतचा भाग जोडण्यात आला आहे, तर मंगलोर बंदर दक्षिण रेल्वेने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे १९९८ ला सुरू झालेल्या कोकण रेल्वेला गेल्या १६ वर्षांत पाच हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला असून, वर्षाला कोकण रेल्वे सरासरी तीनशे कोटी रुपयांनी तोट्यात आहे. रोहा ते मंगलोर हा कोकण रेल्वेचा ७६१ किलोमीटरचा पट्टा आहे. मग वीस किलोमीटरचा भाग आम्ही कसा सोडू? त्याच्यावर आमचा दावा असून, मी याबाबत खासदार येदियुरप्पा यांचीही भेट घेऊन हा मार्ग मिळावा, अशी मागणी केली आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाच्याही संपर्कात आहे.- भानू प्रकाश तायल, संचालक, कोकण रेल्वे