शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

कोकण रेल्वेला दरवर्षी तीनशे कोटींचा तोटा

By admin | Updated: February 25, 2015 00:10 IST

१९९० मध्ये रोहा ते मंगलोर अशा ७६१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात आली; पण १९९८ ला कोकण रेल्वे पूर्णत: सुरू झाली, तेव्हा ७४१ किलोमीटरपर्यंतच धावू लागली.

अनंत जाधव - सावंतवाडी -रोहा ते मंगलोर या १९९० ला मंजुरी मिळालेल्या कोकण रेल्वेचा ७६१ किलोमीटरपैकी २० किलोमीटरचा ठोकूर ते मंगलोर हा भाग दक्षिण रेल्वेने बळकावल्याने कोकण रेल्वेला दरवर्षी ३०० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्रालयाला परिस्थितीजन्य पुरावे देत हा वीस किलोमीटरचा भाग पुन्हा कोकण रेल्वेला जोडला जावा, अशी मागणी केली आहे. मात्र, तिला रेल्वे मंत्रालयाने केराची टोपली दाखविली आहे. याप्रकरणी बंगलोर येथील उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे.कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या चार राज्यांतून धावते. १९९० मध्ये रोहा ते मंगलोर अशा ७६१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात आली; पण १९९८ ला कोकण रेल्वे पूर्णत: सुरू झाली, तेव्हा ७४१ किलोमीटरपर्यंतच धावू लागली. या रेल्वेचा ठोकूरपर्यंतचा भाग कोकण रेल्वेत घेण्यात आला, तर पुढील २० किलोमीटरचा भाग दक्षिण रेल्वेने काबीज केला. तत्कालीन रेल्वेचे अधिकारी (पान ८ वर)कोकणच्या रेल्वेमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात अपेक्षाठोकूर (कर्नाटक) ते मंगलोर बंदरपर्यंतचा भाग सद्य:स्थितीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळेच मिळू शकतो, अन्यथा हा मार्ग मिळणे कोकण रेल्वेसाठी कठीण आहे. याबाबत कोकण रेल्वेने तत्कालीन रेल्वेचे अधिकारी ई. श्रीधरन यांच्यासह रेल्वे मंत्रालयाशी झालेला करार रेल्वे मंत्रालयाच्या दरबारी ठेवला असून, हा मार्ग कोकण रेल्वेला मिळावा यासाठी कर्नाटक पॅसेंजर असोसिएशनने २०१३ मध्ये बंगलोर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. रेल्वे अर्थसंकल्पात प्रभू याबाबत काही घोषणा करणार का? याकडे कोकणवासीयांचे लक्ष आहे.आणि कोकण रेल्वे प्रत्यक्षात कृतीत आणणारे ई. श्रीधरन यांनीही १९९८ ला रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून ठोकूर ते मंगलोर बंदरपर्यंतचा दक्षिण रेल्वेला जोडलेला भाग पुन्हा कोकण रेल्वेला जोडला जावा, अशी मागणी केली होती; पण या मागणीला रेल्वे मंत्रालयाने केराची टोपली दाखवली.दक्षिण रेल्वेने मंगलोरपर्यंतचा वीस किलोमीटरचा भाग आपल्या ताब्यात घेतल्याने कोकण रेल्वेचे दरवर्षी साधारणत: तीनशे कोटींचे नुकसान होत आहे. कोकण रेल्वे स्वत:चे उत्पादन घेईल, अशी कोणतीही उपाययोजना नाही. कोकण रेल्वेच्या ताब्यात सद्य:स्थितीत कोणतेही बंदर नाही. एकमेव मंगलोर बंदरावर दक्षिण रेल्वेने अधिकार सांगितला आहे. याशिवाय डिझेल तसेच रेल्वेभाडे आदी बाबींवर कोकण रेल्वेचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. तसेच कोकण रेल्वे सुरू करण्यासाठी घेतलेले कर्ज अद्याप देणे बाकी आहे. यामुळे कोकण रेल्वे आर्थिक अडचणीत असतानाच कोकण रेल्वेला फायदा करून देणारे मंगलोर बंदर तरी आपणास मिळावे, यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. १६ वर्षांत पाच हजार कोटींचा तोटाकोकण रेल्वेला ठोकूरपर्यंतचा भाग जोडण्यात आला आहे, तर मंगलोर बंदर दक्षिण रेल्वेने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे १९९८ ला सुरू झालेल्या कोकण रेल्वेला गेल्या १६ वर्षांत पाच हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला असून, वर्षाला कोकण रेल्वे सरासरी तीनशे कोटी रुपयांनी तोट्यात आहे. रोहा ते मंगलोर हा कोकण रेल्वेचा ७६१ किलोमीटरचा पट्टा आहे. मग वीस किलोमीटरचा भाग आम्ही कसा सोडू? त्याच्यावर आमचा दावा असून, मी याबाबत खासदार येदियुरप्पा यांचीही भेट घेऊन हा मार्ग मिळावा, अशी मागणी केली आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाच्याही संपर्कात आहे.- भानू प्रकाश तायल, संचालक, कोकण रेल्वे