शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कोकणी उत्पादने स्थानकांवर

By admin | Updated: March 3, 2015 22:18 IST

बचत गटांना हातभार : ‘कोकण रेल्वे’ने खरेदी केला ४७ हजारांचा माल

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत कोकण रेल्वेने स्टॉलवरील विक्रीसाठी जिल्ह्यातील बचत गटांकडून ४६ हजार ९०० रूपयांचा माल खरेदी केला आहे. भविष्यात खाद्यपदार्थ खरेदी करताना कोणत्याही समस्या येऊ नयेत, यासाठी ‘कोकणरत्न’ बचत गट फेडरेशन स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणी पदार्थ किंवा कोकणी मेवा रेल्वे स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कोकणी पदार्थ कोकण रेल्वे स्थानकातील स्टॉलवर ठेवण्यात येणार आहेत. कोकणी मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी व ती स्थानिक स्तरावरच उपलब्ध व्हावी, या दोन्ही हेतूंबरोबरच विविध ठिकाणांहून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना महत्त्वाच्या स्थानकांवर कोकणी मेवा उपलब्ध व्हावा यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यांपैकी नेरूळ (नवी मुंबई) येथील एका स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले आहे. काजूगर, कोकम, कुळीथपीठ, मोदकपीठ, भाजणीपीठ, नाचणीपीठ, आंबोळीपीठ, डांगर, कोकम सरबत, आवळा सरबत, आमरस, आंबावडी, आंबा जेली, भंडग, लसूण चटणी, तमालपत्र, मसाले, विविध चटण्या, पापड, हातसडीचे तांदूळ आदींची खरेदी करण्यात आली आहे.खाद्यपदार्थ विक्रीला ठेवताना त्यासाठी आकर्षक पॅकिंग, वेष्टन असणे आवश्यक आहे. मात्र, ते प्रत्येक बचत गटाला जमेलच असे नाही. शिवाय प्रत्येक खाद्यपदार्थाची न्यूट्रीशन्स तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याबाबत पॅकिंगवर माहिती दिल्यास ग्राहकाला खरेदी करणे सोपे होते. शिवाय संबंधित माल मॉल किंवा मुंबई, पुण्यामध्ये विक्रीस पाठवणे सोपे होते. फेडरेशनची स्थापना झाल्यानंतर बचत गटांचा माल खरेदी करून पॅकिंग करून विक्रला ठेवता येईल. शिवाय बचत गटांना खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देणे सोपे होईल. लागणारे घटक व त्याचे प्रमाण याची माहिती देता येईल. अन्य तांत्रिक माहितीबरोबर स्टॉलकडे बचतगटाचा माल विक्रीसाठी पाठवणे सोपे होणार आहे. (प्रतिनिधी)