शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात राजकीय ‘घूम’शान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 04:30 IST

ऐन पावसाळ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत कोकणच्या विकासा

लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : ऐन पावसाळ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत कोकणच्या विकासाचे गाऱ्हाणे घातल्याने कोकणवासीय अक्षरश: चिंबचिंब झाले. आजवर एकमेकांच्या नावे शिमगा करणारे काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येण्याचा अपूर्व योग यानिमित्ताने जुळून आल्याने हे कौतिक पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.मुंबई ते झाराप या मार्गावरील शेवटच्या चौथ्या टप्प्याच्या मार्गाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह सुरेश प्रभू, अनंत गिते, रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राणे यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी स्वागत फलक लावले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस व गडकरींचे फोटो असल्याने राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, स्थानिक आमदार म्हणून सर्वांचे स्वागत करणे, हे आमचे कर्तव्य असल्याचे आ.नितेश राणे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. नारायण राणे यांनी आपल्या भाषणात सर्वांचा उल्लेख करत विकासासाठी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका मांडली. तर उद्धव ठाकरे यांनी राणे यांचा उल्लेख ह्यमाझे पूर्वीचे सहकारीह्ण असा केला. एकाच छताखाली वेगवेगळ्या घोषणा देतो, पण विकासासाठी आपण एकत्र आलो याचे समाधान आहे. विकासाच्या आड राजकारण येता कामा नये, राजकारण राजकारणाच्या दिशेला असावे म्हणत उद्धव यांनीही राणेंच्या व्यक्तव्याला दुजोरा दिला. गडकरी म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील रस्ता पूर्ण होत आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. कोकणच्या विकासात सर्व जण एकत्र येऊन काम करीत असून, आता कोकणला विकासापासून कोणही रोखू शकणार नाहीत. मुंबई ते गोवा एकूण महामार्गाचे ११ टप्पे करण्यात आले असून, सर्व कामे एकाच वेळी सुरू करण्यात आली आहेत. भूसंपादन करत असतानाही कुणाला नाराज करण्यात आले नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीनही जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपादनाचे ३१०० कोटी पडून आहेत. काही ठिकाणी भूसंपादनाची कामे सुरूही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोकणात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणल्याने कोकणवासीयांचा आशीर्वाद केंद्रीय मंत्री गडकरी यांना मिळेल. कोकणात लवकरच ताज ग्रुप पंचतारांकित हॉटेल सुरू करणार आहे. त्या माध्यमातून येथील पर्यटन वाढेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.काँग्रेस पदाधिकारी ताब्यातकार्यक्रमस्थळी राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार घोषणायुद्ध झाले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यासपीठावर होते. काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षांनाही व्यासपीठावर घेतले पाहिजे, याकरिता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली. या वेळी त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. या बाचाबाचीमुळे पोलिसांनी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्यासहित जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर या तीन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.