शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

आनंदवन’साठी कोल्हापूरकरांचा ‘आहेर’

By admin | Updated: September 4, 2015 22:49 IST

३०० पेट्या कपडे रवाना : चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेने ‘जुने कपडे देऊया, आनंदवन फुलवूया’ अशी भावनिक हाक देत संकलित केलेल्या कपड्यांच्या ‘आहेराचा ट्रक’ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘आनंदवन’कडे रवाना करण्यात आला. कपड्यांच्या ३०० पेट्यांनी भरलेला ट्रक पाठविण्यात आला. यामुळे आनंदवनातील कुष्ठरोग्यांना कोल्हापूरकरांच्या मायेची ऊब मिळणार आहे.वर्धा जिल्ह्णातील वरोड्याजवळ बाबा आमटे यांनी १९५२ साली ‘आनंदवन’ची स्थापना केली. सध्या ते साडेतीन हजार कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. तेथील कुष्ठरोगी लोकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहर, परिसर, जिल्ह्णातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. संकलित झालेले कपडे रवाना करण्याच्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, मी नेहमी गरीब, वंचितांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. वाढदिवसानिमित्त मी हार, तुरे, पुष्पगुच्छांऐवजी रद्दी स्वीकारतो. यातून तीन लाख रुपये गोळा झाले आहेत. हे तीन लाख आणि माझ्या फंडातील तीन लाख असे सहा लाख रुपये येथील ‘सावली’ संस्थेला देणार आहे. जिल्हा परिषदेने आनंदवनासाठी कपडे संकलित करण्याचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. यापुढेही असेच उपक्रम सुरू ठेवावेत. समाजोपयोगी कार्यक्रमांना सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाठबळ दिले जाईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, अनेक कुटुंबांकडे औषधे शिल्लक राहतात. चांगल्या स्थितीतील आणि मुदतीमध्ये असलेली औषधे संकलित करून गरीब, गरजूंना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्याचा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेणार आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी रक्तदान शिबिरही आयोजित करण्याचा मानस आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, राज्यात चांगले काम करणारी जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूरचा लौकिक आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेने राबविलेले अनेक उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यांत राबविले आहेत. ‘आनंदवन’चे कामही चांगले आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, सभापती किरण कांबळे, अभिजित तायशेटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी )साटलोटं...डॉक्टर आणि औषध दुकानदार यांच्यात सध्या साटलोटे दिसते. यातून डॉक्टर रुग्णांना उपचारावेळी भरमसाट औषधे लिहून देत असतात. आजार बरा झाल्यानंतर रुग्णांची अनेक औषधे बंद होतात किंवा बंद केली जातात. पण आणलेली औषधे तशीच घरात शिल्लक राहतात. ती संकलित करून गरजंूना दिल्यास त्याचा फायदा होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले