शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

विमानसेवेचा ‘नाद’ कोल्हापूरकरांनी सोडला

By admin | Updated: February 2, 2015 00:17 IST

‘टेक आॅफ’ रखडले : चर्चेच्या फेऱ्याही थांबल्या, कोंडी फुटेना

कोल्हापूर : दिवसाला येता-जाता एकूण ९५ प्रवासी देण्याची हमी आणि साधारणत: सात हजार रुपये तिकीट दर, अशी विमानसेवा पुरविणाऱ्या कंपनीची मागणी आहे. याउलट साडेचार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर असावा, अशी मागणी स्थानिक उद्योजक, व्यापारी, प्रवाशांची आहे. त्यातच कोल्हापूरच्या विमानसेवेचे ‘टेक आॅफ’ अडले आहे. लोकप्रतिनिधींचा पुढाकार, उद्योजक-व्यापाऱ्यांसह सेवा देणाऱ्या ‘जेट एअरवेज’ कंपनीची तयारी असूनदेखील विमानसेवा सुरू होण्याची कोंडी फुटत नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांना या सेवेचा विसर पडला की काय? असे चित्र आहे.कोल्हापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक विकासाच्यादृष्टीने आवश्यक असणारी विमानसेवा पुरविण्यासाठी ‘जेट एअरवेज’ने गेल्या दोन महिन्यांपूर्वी तयारी दर्शविली. त्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी ‘इंडस्ट्रिया २०१४’ या प्रदर्शनात दिली. त्यावर ‘जेट एअरवेज’ने सर्व्हे केला. त्यातून कंपनीने, कोल्हापूरहून मुंबईला जाताना ४०, तर मुंबईहून कोल्हापूरला येताना ४५ प्रवासी दररोज देण्याची हमी कोल्हापुरातील उद्योजक-व्यावसायिक संघटनांनी द्यावी, तसेच तिकीट दर सात हजार रुपये राहील, अशा काही तत्त्वत: अटी ठेवल्या; पण साडेतीन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर सोयीस्कर असल्याचे म्हणणे स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांचे आहे. त्यातच विमानसेवेचा प्रारंभ अडकला आहे. त्यातूनच सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)‘जेट एअरवेज’कडून कोल्हापूरमध्ये विमानसेवा पुरविण्याची चाचपणी केली. त्यातून कंपनीने तिकीट दर, प्रवासी, आदींची तत्त्वत: निश्चिती केली आहे. विमानसेवेस सहकार्य करण्याची पत्रे कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन, गोशिमा, स्मॅक, आदी उद्योजकीय संघटनांनी दिली आहेत. कोल्हापूर-मुंबई सेवा पुरविण्याचा परवाना, शिवाय ‘एटीआर’देखील जेट एअरवेजकडे आहे. त्यामुळे प्रवाशांची हमी आणि तिकीट दर निश्चित झाल्यास सेवा सुरू होण्यास हरकत नाही. - एन. एन. अत्तार, व्यवस्थापक, रसिका ट्रॅव्हल्ससाडेपाच हजार भाडे परवडणारे...ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ३५०, रेल्वेद्वारे ६५०, तर स्वत:ची वाहने घेऊन शंभरजण दरदिवशी मुंबई-पुण्याला जातात. टोल तसेच अन्य स्वरूपातील खर्च धरता त्यांना त्यासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. त्या तुलनेत वेळ व आरामदायी असलेल्या विमान प्रवासासाठी साडेपाच हजार रुपये भाडे परवडणारे असल्याचे काही प्रवासी, ट्रॅव्हल्स कंपनीच्या चालकांनी सांगितले.