शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोल्हापूर होणार ‘निर्मल’ महापालिका

By admin | Updated: November 18, 2015 02:32 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या (नागरी) धर्तीवर राज्यातील २६ महानगरपालिका व २३९ नगरपरिषदांमध्ये राबविण्यात येत असलेल्या नागरी क्षेत्रातील स्वच्छ महाराष्ट्र

- जयंत धुळप,  अलिबागकेंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या (नागरी) धर्तीवर राज्यातील २६ महानगरपालिका व २३९ नगरपरिषदांमध्ये राबविण्यात येत असलेल्या नागरी क्षेत्रातील स्वच्छ महाराष्ट्र अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील १९ नगरपरिषदा निर्मल झाल्या आहेत, तर कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील पहिली निर्मल महानगरपालिका होत आहे. त्याची घोषणा येत्या ३० डिसेंबरला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव सुधाकर बोबडे यांनी दिली. ते सोमवारी मंत्रालयात झालेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान परीक्षण समितीच्या बैठकीत बोलत होते. राज्यातील १९ निर्मल नगरपालिकांमध्ये सर्वाधिक आठ नगरपालिका कोकणातील आहेत. त्यात रायगड जिल्ह्यातील माथेरान, रोहा, महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, खेड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या नगरपालिकांचा समावेश आहे. उर्वरित निर्मल नगरपालिकांमध्ये महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, मलकापूर, पन्हाळा,भगुर, मोवाड, कुर्डूवाडी व करमाळा यांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘बी’ आणि ‘सी’ हे दोन वॉर्ड ‘निर्मल’ झाले आहेत. हे अभियान २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे, २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत देशभर राबविण्यात येत आहे.