शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये टोलने केला भाजपाचा घात!

By admin | Updated: November 3, 2015 02:33 IST

तीन पक्षांतून कुटुंबातील तिघे राजकारण करणारे आमदार महादेवराव महाडिक शहाणे की कोल्हापूरची जनता, असा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला होता. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत

- विश्वास पाटील (कोल्हापूर विश्लेषण)तीन पक्षांतून कुटुंबातील तिघे राजकारण करणारे आमदार महादेवराव महाडिक शहाणे की कोल्हापूरची जनता, असा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला होता. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत जनतेने दोन्ही काँग्रेसकडे सत्ता सोपवून महाडिक यांच्या राजकारणाला चपराक दिली. शिवाय, त्यांची संगत करणाऱ्या भाजपालाही फटकारले. पक्षीय निष्ठा, राजकीय बांधिलकी गुंडाळून ठेवून तुम्ही रोज एक भूमिका घेणार असाल, तर जनता अद्दल घडविल्याशिवाय राहत नाही, याची चुणूक दाखविणारा हा निकाल आहे.कोल्हापूर महापालिका निवडणुकीत टोलच्या प्रश्नाने भाजपाचा पुरता घात केल्याने, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखण्यात बाजी मारली. ही निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी ठरली होती. भाजपा-शिवसेनेच्या राज्यस्तरीय संबंधावर परिणाम करणारी निवडणूक म्हणूनही तिच्याकडे पाहिले गेले. कारण याच निवडणुकीच्या प्रचारात या दोन सत्तेतल्या पक्षांनी एकमेकांना शड्डू ठोकले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या या निवडणुकीत मुख्यत: भाजपाचे भवितव्य पणाला लागले होते, परंतु मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मर्यादित यश टाकले. शिवसेनेचा दारुण पराभव झाला. या पक्षाला कशाबशा चारच जागा मिळाल्या. ‘शिवसेनेपेक्षा जास्त जिंकायचे’ भाजपाचे स्वप्न साकार झाले, तरी त्यांना महापालिकेवर मात्र सत्तेचे कमळ फुलविता आले नाही. विधानसभा निवडणुकीत जे लोकमानस होते, तेच वर्षभरानंतर कायम आहे का, याचीही लिटमस टेस्ट म्हणून या निकालाकडे पाहिले गेले, परंतु त्यामध्ये भाजपाचा त्या वेळेचा जनाधार कमी झाल्याचे निकालाने दाखवून दिले. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे, त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. भाजपाने काही मटकेवाले, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनाही उमेदवारी दिली. साधनशुचितेचा आव आणणारा पक्ष सत्तेसाठी कोणालाही मिठ्या मारतो, असे चित्र त्यातून लोकांना पाहायला मिळाले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देऊन काँग्रेसला सर्वाधिक जागा जिंकून दिल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपाही त्यांनी या निकालाने काढला. काँग्रेसच्या राजकारणात महाडिक व सतेज पाटील यांच्यातील संघर्षाची धारही या लढतीला होती. त्यात सतेज यांनी बाजी मारली असून, त्यांचे यापुढील टार्गेट आता महाडिक यांची विधान परिषदेची निवडणूक असणार हेदेखील निश्चित झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेल्या टोलने विधानसभेला सतेज पाटील यांचा पराभव केला, परंतु तोच टोल रद्द करण्याचे आश्वासन देऊनही भाजपाचा पराभव वाचवू शकला नाही. राज्य सरकारने दिलेले आश्वासन मतदारांना भुरळ घालू शकले नाही. विधानसभा निवडणुकीत १०पैकी ६ जागा शिवसेनेला आणि प्रत्येकी २ भाजपा व राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची स्थिती काय राहणार? याबद्दल लोकांत उत्सुकता होती, परंतु या निवडणुकीने काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकल्याचे चित्र शहरात दिसले. शिवसेनेला मर्यादित यश मिळाले. पक्षाचे चारच नगरसेवक होते, तेवढेच या वेळेलाही निवडून आले. ताकदीच्या उमेदवारांची वानवा, संघटनात्मक पाया नाही आणि आर्थिक बळ कमी पडल्याने शिवसेना पराभूत झाली. मतदारांनी प्रस्थापित उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. पैशांचा प्रचंड वापर झाला, तरीही मतदारांनी ज्यांना निवडून द्यायचे आहे, त्यांनाच मतदान केल्याचेही निकालावरून दिसले.