शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

कोल्हापूरमध्ये टोलने केला भाजपाचा घात!

By admin | Updated: November 3, 2015 02:33 IST

तीन पक्षांतून कुटुंबातील तिघे राजकारण करणारे आमदार महादेवराव महाडिक शहाणे की कोल्हापूरची जनता, असा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला होता. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत

- विश्वास पाटील (कोल्हापूर विश्लेषण)तीन पक्षांतून कुटुंबातील तिघे राजकारण करणारे आमदार महादेवराव महाडिक शहाणे की कोल्हापूरची जनता, असा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला होता. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत जनतेने दोन्ही काँग्रेसकडे सत्ता सोपवून महाडिक यांच्या राजकारणाला चपराक दिली. शिवाय, त्यांची संगत करणाऱ्या भाजपालाही फटकारले. पक्षीय निष्ठा, राजकीय बांधिलकी गुंडाळून ठेवून तुम्ही रोज एक भूमिका घेणार असाल, तर जनता अद्दल घडविल्याशिवाय राहत नाही, याची चुणूक दाखविणारा हा निकाल आहे.कोल्हापूर महापालिका निवडणुकीत टोलच्या प्रश्नाने भाजपाचा पुरता घात केल्याने, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखण्यात बाजी मारली. ही निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी ठरली होती. भाजपा-शिवसेनेच्या राज्यस्तरीय संबंधावर परिणाम करणारी निवडणूक म्हणूनही तिच्याकडे पाहिले गेले. कारण याच निवडणुकीच्या प्रचारात या दोन सत्तेतल्या पक्षांनी एकमेकांना शड्डू ठोकले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या या निवडणुकीत मुख्यत: भाजपाचे भवितव्य पणाला लागले होते, परंतु मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मर्यादित यश टाकले. शिवसेनेचा दारुण पराभव झाला. या पक्षाला कशाबशा चारच जागा मिळाल्या. ‘शिवसेनेपेक्षा जास्त जिंकायचे’ भाजपाचे स्वप्न साकार झाले, तरी त्यांना महापालिकेवर मात्र सत्तेचे कमळ फुलविता आले नाही. विधानसभा निवडणुकीत जे लोकमानस होते, तेच वर्षभरानंतर कायम आहे का, याचीही लिटमस टेस्ट म्हणून या निकालाकडे पाहिले गेले, परंतु त्यामध्ये भाजपाचा त्या वेळेचा जनाधार कमी झाल्याचे निकालाने दाखवून दिले. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे, त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. भाजपाने काही मटकेवाले, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनाही उमेदवारी दिली. साधनशुचितेचा आव आणणारा पक्ष सत्तेसाठी कोणालाही मिठ्या मारतो, असे चित्र त्यातून लोकांना पाहायला मिळाले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देऊन काँग्रेसला सर्वाधिक जागा जिंकून दिल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपाही त्यांनी या निकालाने काढला. काँग्रेसच्या राजकारणात महाडिक व सतेज पाटील यांच्यातील संघर्षाची धारही या लढतीला होती. त्यात सतेज यांनी बाजी मारली असून, त्यांचे यापुढील टार्गेट आता महाडिक यांची विधान परिषदेची निवडणूक असणार हेदेखील निश्चित झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेल्या टोलने विधानसभेला सतेज पाटील यांचा पराभव केला, परंतु तोच टोल रद्द करण्याचे आश्वासन देऊनही भाजपाचा पराभव वाचवू शकला नाही. राज्य सरकारने दिलेले आश्वासन मतदारांना भुरळ घालू शकले नाही. विधानसभा निवडणुकीत १०पैकी ६ जागा शिवसेनेला आणि प्रत्येकी २ भाजपा व राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची स्थिती काय राहणार? याबद्दल लोकांत उत्सुकता होती, परंतु या निवडणुकीने काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकल्याचे चित्र शहरात दिसले. शिवसेनेला मर्यादित यश मिळाले. पक्षाचे चारच नगरसेवक होते, तेवढेच या वेळेलाही निवडून आले. ताकदीच्या उमेदवारांची वानवा, संघटनात्मक पाया नाही आणि आर्थिक बळ कमी पडल्याने शिवसेना पराभूत झाली. मतदारांनी प्रस्थापित उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. पैशांचा प्रचंड वापर झाला, तरीही मतदारांनी ज्यांना निवडून द्यायचे आहे, त्यांनाच मतदान केल्याचेही निकालावरून दिसले.