शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

जानकर, खोत यांना मंत्रिपद!

By admin | Updated: November 24, 2015 03:09 IST

राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत या दोघांनाच मंत्रिपदे द्यायची तयारी भारतीय जनता पार्टीने दर्शविली आहे.

यदु जोशी, मुंबईराष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत या दोघांनाच मंत्रिपदे द्यायची तयारी भारतीय जनता पार्टीने दर्शविली आहे. खा.रामदास आठवले स्वत: मंत्री होणार असतील, तरच संधी दिली जाणार असून, शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांना तूर्त मंत्रिपद दिले जाणार नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी रिपाइंचे खा. आठवले, ‘स्वाभिमानी’चे खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. जानकर आणि शिवसंग्रामचे आ. मेटे यांच्यासोबत बैठक घेतली. मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराबाबत सर्वांची मते जाणून घेण्यात आली.त्यानंतर रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष दानवे, सहकार मंत्री पाटील, सहप्रभारी खा.राकेश सिंग, व्ही. सतीश आदी उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात भाजपातून कोणाला संधी द्यायची या बाबत चर्चा झाली. या शिवाय, मित्रपक्षांच्या नेत्यांपैकी जानकर व खोत यांना मंत्रिपद द्यावे. आठवले स्वत: मंत्री होणार असतील तरच त्यांच्या पक्षाला संधी द्यावी, अशी भूमिका समोर आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. जानकर हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. मात्र, स्वाभिमानीचे खोत हे दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत. पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर सदस्य पाठविण्यासाठी निवडणूक आहे. त्यात खोत यांना निवडून आणणे शक्य नाही. त्यामुळे जुलै २०१६ मध्ये विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर सदस्य पाठविताना खोत यांना संधी दिली जाईल, असे मानले जात आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री फौजिया खान यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपला तरी त्या मंत्री राहिल्या होत्या. तोच पॅटर्न खोत यांच्या बाबत राबविला जाऊ शकतो. आ. मेटे यांना अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीचे अध्यक्षपद आधीच देण्यात आले आहे. ते त्यांच्याकडे कायम ठेवावे आणि त्यांना मंत्रिपद देऊ नये, असा भाजपामध्ये सूर आहे. मात्र, मेटे यांना मंत्रिपदच हवे आहे. ते म्हणाले, मंत्रिपदाचे आश्वासन भाजपाने आम्हाला विधानसभा निवडणुकीपूर्वीच दिले होते. ते आतातरी पूर्ण करावे, अशी आमची भूमिका आहे. बैठकीत विस्ताराबाबत चर्चा झाली. कोणत्याही घटक पक्षाने त्यांना अमुकच मंत्रिपद हवे, असा आग्रह धरलेला नाही. मात्र विस्तारात मित्रपक्षांना स्थान दिले जाईल. - रावसाहेब दानवे (प्रदेशाध्यक्ष, भाजपा)वर्षभरातील सरकारच्या कामगिरीबाबत आम्ही असमाधान कधीही व्यक्त केले नव्हते. सरकारच्या धोरणांबाबत आजच्या बैठकीत मित्रपक्षांनी भूमिका मांडली. मंत्रिमंडळात सामावून घेण्याबाबत भाजपाने दिलेले आश्वासन पाळावे.- खा. राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद मिळाले पाहिजे, ही आमची मागणी कायम आहे. मला स्वत:ला राज्यात यायचे नाही; पण आमच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद दिले पाहिजे. आपली पत्नी सीमा आठवले यांना मंत्रिपद देण्याचा प्रश्नच येत नाही. घरात सत्ता ठेवावी या विचारांचा मी नाही. - खा. रामदास आठवले (रिपाइं)