शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ नये - किशोर तिवारी

By admin | Updated: June 20, 2017 17:49 IST

राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाऊ नये असे सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाऊ नये असे सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. 
राज्यात भाजपाची सत्ता आली असून विदर्भाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे सर्वांच्या पोटात गोळा आला आहे. तसेच, शेतक-यांचे आंदोलन राजकीय होते. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते, असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
किशोर तिवारी यावेळी म्हणाले की, शेतकरी आंदोलनात सुकाणू समितीने केलेल्या मागण्या अतिशय चुकीच्या आणि गैर असून शेतक-यांनी सरसरकट कर्जमाफीची गरज नाही. शेतकरी आंदोलन करणारे कोण ? चालवणारे कोण ? त्यांच्या पाठीमागे कोण? याबाबतचे व्हिडीओ आम्ही पहिले. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे शेतक-यांचे हे आंदोलन राजकीय पूर्णपणे राजकीय होते, असा दावा त्यांनी केला आहे. 
खासदार राजू शेट्टी हे मोदींच्या लाटेत निवडणूक आले असून त्यांनी आपल्या संघटनेचा एकही उमेदवार निवडून आणला नाही. जे सुकाणू समितीत आहेत किंवा कायदा- सुव्यवस्थेच्या गप्पा करत आहेत, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असाही सवाल करत ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा जितका राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, त्यापेक्षा दुप्पट शेतकरी नेत्यांवरुन विश्वास उडाला आहे. शेतकरी नेते मांडवली करतात. तसेच, आपली सोय झाली की विषय सोडून देतात. 
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची पाठराखण करत त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर सुद्धा आरोप केले आहेत. मुख्यमंत्री थेट गरिबांपर्यंत पोहोचत असल्यामुळे, भाजपाच्या आतील आणि बाहेरील नेत्यांना याची भीती वाटत आहे.  तसेच, मुख्यमंत्री चांगले काम करु इच्छित आहेत, त्यामुळे मी त्यांना साथ द्यायला आलो आहे. मला भाजपाच्या दांभिक नेत्यांशी काही घेणे देणे नाही, असेही यावेळी किशोर तिवारी म्हणाले.