शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ नये - किशोर तिवारी

By admin | Updated: June 20, 2017 17:49 IST

राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाऊ नये असे सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाऊ नये असे सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. 
राज्यात भाजपाची सत्ता आली असून विदर्भाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे सर्वांच्या पोटात गोळा आला आहे. तसेच, शेतक-यांचे आंदोलन राजकीय होते. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते, असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
किशोर तिवारी यावेळी म्हणाले की, शेतकरी आंदोलनात सुकाणू समितीने केलेल्या मागण्या अतिशय चुकीच्या आणि गैर असून शेतक-यांनी सरसरकट कर्जमाफीची गरज नाही. शेतकरी आंदोलन करणारे कोण ? चालवणारे कोण ? त्यांच्या पाठीमागे कोण? याबाबतचे व्हिडीओ आम्ही पहिले. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे शेतक-यांचे हे आंदोलन राजकीय पूर्णपणे राजकीय होते, असा दावा त्यांनी केला आहे. 
खासदार राजू शेट्टी हे मोदींच्या लाटेत निवडणूक आले असून त्यांनी आपल्या संघटनेचा एकही उमेदवार निवडून आणला नाही. जे सुकाणू समितीत आहेत किंवा कायदा- सुव्यवस्थेच्या गप्पा करत आहेत, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असाही सवाल करत ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा जितका राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, त्यापेक्षा दुप्पट शेतकरी नेत्यांवरुन विश्वास उडाला आहे. शेतकरी नेते मांडवली करतात. तसेच, आपली सोय झाली की विषय सोडून देतात. 
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची पाठराखण करत त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर सुद्धा आरोप केले आहेत. मुख्यमंत्री थेट गरिबांपर्यंत पोहोचत असल्यामुळे, भाजपाच्या आतील आणि बाहेरील नेत्यांना याची भीती वाटत आहे.  तसेच, मुख्यमंत्री चांगले काम करु इच्छित आहेत, त्यामुळे मी त्यांना साथ द्यायला आलो आहे. मला भाजपाच्या दांभिक नेत्यांशी काही घेणे देणे नाही, असेही यावेळी किशोर तिवारी म्हणाले.