शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ नये - किशोर तिवारी

By admin | Updated: June 20, 2017 17:49 IST

राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाऊ नये असे सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाऊ नये असे सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. 
राज्यात भाजपाची सत्ता आली असून विदर्भाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे सर्वांच्या पोटात गोळा आला आहे. तसेच, शेतक-यांचे आंदोलन राजकीय होते. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते, असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
किशोर तिवारी यावेळी म्हणाले की, शेतकरी आंदोलनात सुकाणू समितीने केलेल्या मागण्या अतिशय चुकीच्या आणि गैर असून शेतक-यांनी सरसरकट कर्जमाफीची गरज नाही. शेतकरी आंदोलन करणारे कोण ? चालवणारे कोण ? त्यांच्या पाठीमागे कोण? याबाबतचे व्हिडीओ आम्ही पहिले. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे शेतक-यांचे हे आंदोलन राजकीय पूर्णपणे राजकीय होते, असा दावा त्यांनी केला आहे. 
खासदार राजू शेट्टी हे मोदींच्या लाटेत निवडणूक आले असून त्यांनी आपल्या संघटनेचा एकही उमेदवार निवडून आणला नाही. जे सुकाणू समितीत आहेत किंवा कायदा- सुव्यवस्थेच्या गप्पा करत आहेत, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असाही सवाल करत ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा जितका राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, त्यापेक्षा दुप्पट शेतकरी नेत्यांवरुन विश्वास उडाला आहे. शेतकरी नेते मांडवली करतात. तसेच, आपली सोय झाली की विषय सोडून देतात. 
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची पाठराखण करत त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर सुद्धा आरोप केले आहेत. मुख्यमंत्री थेट गरिबांपर्यंत पोहोचत असल्यामुळे, भाजपाच्या आतील आणि बाहेरील नेत्यांना याची भीती वाटत आहे.  तसेच, मुख्यमंत्री चांगले काम करु इच्छित आहेत, त्यामुळे मी त्यांना साथ द्यायला आलो आहे. मला भाजपाच्या दांभिक नेत्यांशी काही घेणे देणे नाही, असेही यावेळी किशोर तिवारी म्हणाले.